AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा बोहल्यावर चढणार, कोण आहे तो?

के.एल. राहुलनंतर भारताचा आणखी एक खेळाडू अडकतोय विवाह बंधनात, महत्त्वाचं म्हणजे आधी त्याचा विवाह झाला असून तो पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकत आहे.

टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू पुन्हा बोहल्यावर चढणार, कोण आहे तो?
| Updated on: Feb 13, 2023 | 5:43 PM
Share

मुंबई : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे पांड्या पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. हार्दिक पांड्याने क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. टी-20 क्रिकेट फॉरमॅटमधील आता झालेल्या मालिकांमध्ये हार्दिकने नेतृत्त्व सांभाळलं होतं. भारताचा भावी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे पाहिलं जातं. अशातच पांड्या पुन्हा एकदा विवाह करणार असल्याने त्याची सर्वत्र चर्चा आहे. पांड्याचा विवाह झाला असताना परत कोणासोबत पांड्या विवाह करत आहे? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.

हार्दिक पांड्या त्याच्याच पत्नीसोबत लग्न करणार आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हार्दिकने उदयपूरची निवड केली आहे. हार्दिक पांड्याने आधी लग्न केलं असताना आता पुन्हा का लग्न करत आहे? याच कारण म्हणजे हार्दिक पांड्याने 31 मे 2020 रोजी मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यावेळी कोरोनाची साथ असल्यामुळे घरच्यांच्या उपस्थितीतच विवाह पार पडला होता.

हार्दिक पांंड्याने डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी उदयपूरची निवड केली आहे. मात्र कोणत्या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा होणार आहे याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. लग्नाचे कार्यक्रम 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत. हळद, मेहंदीसह अन्य कार्यक्रमही होणार आहेत. 14 फेब्रुवारीला हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न पार पडणार आहे. या लग्नाला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील स्टार्स उपस्थित राहू शकतात.

उदयपूरमध्ये याआधी अनेक डेस्टिनेशन वेडिंग्स झाले आहेत. यामधील उदय विलास, लीला, लेक पॅलेस, फतेह प्रकाश आणि जग मंदिर सितारा ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत. यामधीलच एका हॉटेलमध्ये पांड्याचं डेस्टिनेशन वेडिग होणार असल्याचं बोलंल जात आहे.

दरम्यान,  हार्दिक पांड्याने आतापर्यंत 11 कसोटी, 71 एकदिवसीय, 87 एकदिवसीय आणि 107 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत 1 शतकासह 532 धावा, वनडेत 9 अर्धशतकांसह 1518 धावा, टी 20 तीन अर्धशतकांसह 1271 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कसोटीत 17, वनडेत 68 आणि टी 20मध्ये 69 गडी बाद केले आहेत.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.