AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही 1500 दिले की महिला.., आदिती तटकरेंनी उडवली लाडक्या बहिणींची खिल्ली, वातावरण तापण्याची शक्यता

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. अशा घरातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेवर बोलताना आदिती तटकरे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे, त्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आम्ही 1500 दिले की महिला.., आदिती तटकरेंनी उडवली लाडक्या बहिणींची खिल्ली, वातावरण तापण्याची शक्यता
Aditi TatkareImage Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Updated on: Jul 26, 2026 | 7:02 PM
Share

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेसाठी केवायसी सक्तीची केली, केवायसीनंतर लाखो महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवत त्यांची नावं या योजनेतून वगळ्यात आली, त्यामुळे विरोधकांकडून या मुद्द्यावरून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या योजनेवर बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी आता महिलांची खिल्ली उडवली आहे. त्या वाशिममध्ये बोतल होत्या, आदिती तटकरे यांच्या या वक्त्यावरून आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. आम्ही दिलेले 1500 रुपये महिला या शॉपिंगवर खर्च करतात, पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर मार्केटमध्ये गर्दी वाढते, असं विधान त्यांनी केलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लडकी बहीण योजनेच्या पैशांवरून महिलांची खिल्ली उडवली असून, आम्ही पैसे दिले की महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी जमा करणार आहात, असं विधान आदिती टकरे यांनी केलं आहे. त्या वाशिम येथील अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त  आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होत्या.आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

ईकेवायसी पुन्हा सुरू 

दरम्यान या योजनेसाठी सरकारने ईकेवायसीसाठी दिलेली मुदत संपली होती, अनेक महिलांना ईकेवायसी करता आली नव्हती, अशा महिलांसाठी आता दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे पुन्हा एकदा ईकेवायसीला सुरुवात झाली आहे, पुढील सहा महिने ईकेवायसी करता येणार आहे.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...