Harbhajan Singh: राहुल द्रविडऐवजी या दिग्गज खेळाडूला T20 संघाचा प्रशिक्षक बनवा,टीम इंडियाच्या खेळाडूची मोठी मागणी
या कारणामुळे टीम इंडियाचा माजी खेळाडू म्हणतोय, "T20 प्रशिक्षक हटवा"
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर निवड समितीसह टीम इंडियाच्या खेळाडूंवरती जोरदार टीका झाली. टीम इंडियामध्ये पुढच्या काही दिवसात मोठा बदल होणार असल्याचे विधान बीसीसीआयने (BCCI) केले. त्यामुळे टीम इंडियात येत्या काही दिवसात बदल दिसणार आहे.
न्यूझिलंड दौऱ्यात T20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्याचबरोबर उद्यापासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनला कर्णधारपद देण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने राहुल द्रविडऐवजी आशिष नेहराला T20 चं प्रशिक्षकपद द्यावं अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे आशिष नेहराने चांगल्या फॉर्ममध्ये असताना निवृत्ती घेतली. त्यामुळे माझ्या अनुशंगाने तो त्यासाठी योग्य ठरेल असं हरभजन सिंगने सांगितलं.
राहूल द्रविडसोबत मी अधिककाळ क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे तो एक महान खेळाडू आहे. त्याच्याकडे एकदिवसीय आणि कसोटीचं सामन्याचं प्रशिक्षकपद असावं असं मतं हरभजनसिंगनं व्यक्त केलं.
विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी झाल्यानंतर प्रशिक्षक राहूल द्रविडवरती सुद्धा चाहत्यांनी टीका केली होती. त्यानंतर टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटसाठी तीन प्रशिक्षक असावे अशी भूमिका अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केली होती.