AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली : पाकिस्तानी प्रशिक्षक

विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला होता. यानंतर मीडिया आणि तज्ञांकडून पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर आत्महत्या करावी वाटली : पाकिस्तानी प्रशिक्षक
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 25, 2019 | 3:44 PM
Share

लंडन : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धचा पराभव एवढा जिव्हारी लागला की मनात आत्महत्येचा विचारही आला होता, अशी कबुली पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी दिली आहे. विश्वचषकातील सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला होता. यानंतर मीडिया आणि तज्ञांकडून पाकिस्तानच्या संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. कारण, विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या विक्रम यावेळीही भारताने कायम ठेवला.

ऑर्थर यांच्या हवाल्याने वृत्त देण्यात आलंय. गेल्या रविवारी माझ्या मनात आत्महत्येचा विचार होता. पण ही फक्त एका सामन्यातील कामगिरी होती आणि सर्व खुप वेगाने झालं. तुम्ही एक सामना हारता, तर दुसरा जिंकता. मीडियाची टीका, चाहत्यांच्या अपेक्षा आणि त्यात आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं आव्हान आहे. आम्ही सर्व सहन केलं, असं ऑर्थर म्हणाले.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन पाकिस्तानने सेमीफायनलची अपेक्षा जिवंत ठेवली. आम्ही उर्वरित सर्व सामने जिंकण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करु, असंही ऑर्थर म्हणाले. तो फक्त एक सामना होता, आपल्याला बाकीच्या सामन्यांमध्ये चांगलं खेळायचंय हेच मी माझ्या खेळाडूंना सांगतो, असंही ते म्हणाले.

या विश्वचषकात पाकिस्तानच्या नावावर 6 सामन्यात 5 गुण आहेत. 10 संघांच्या गुणतालिकेत पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पाकिस्तानचा पुढील सामना बुधवारी बलाढ्य न्यूझीलंडशी आहे. त्यानंतर शनिवारी अफगाणिस्तान आणि 5 जुलै रोजी बांगलादेशसोबत लढत होईल.

Follow Us
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने...
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...