मितालीने धमकी देऊन ब्लॅकमेल केलं : रमेश पोवार

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सदस्य डायना एडलजी हे आपली कारकीर्द संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करणारे पत्र बीसीसीआयला लिहले होते. त्यावर आता प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीवर पलटवार केला आहे. त्यांनी बीसीसीआयला एक रिपोर्ट पाठवला, यामध्ये मिताली राजवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तिच्यावर टीममध्ये फूट पाडणे, प्रशिक्षकांवर दबाव आणणे तसेच ब्लॅकमेल […]

मितालीने धमकी देऊन ब्लॅकमेल केलं : रमेश पोवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमची सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार आणि सदस्य डायना एडलजी हे आपली कारकीर्द संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करणारे पत्र बीसीसीआयला लिहले होते. त्यावर आता प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीवर पलटवार केला आहे. त्यांनी बीसीसीआयला एक रिपोर्ट पाठवला, यामध्ये मिताली राजवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. तिच्यावर टीममध्ये फूट पाडणे, प्रशिक्षकांवर दबाव आणणे तसेच ब्लॅकमेल करण्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रमेश पोवार यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि जनरल मॅनेजर सबा करीम यांना पाठवलेल्या 10 पानी रिपोर्टमध्ये हे आरोप केले. या रिपोर्टमध्ये पोवार यांनी टीमच्या प्रत्येक खेळाडूबाबत आपला रिपोर्ट दिला, पण त्यांचा अर्ध्याहून जास्त रिपोर्ट मिताली राजवर होता.

मिताली राजला नुकत्याच झालेल्या महिला टी-20 विश्व चषक स्पर्धेत इंग्लड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीमच्या बाहेर बसवण्यात आले होते. त्यावर मितालीने बीसीसीआयला पत्र लिहत सदस्य डायना एडलजी आणि प्रशिक्षक रमेश पवार यांच्यावर ताशेरे ओढले.

“बीसीसीआयमधील काही शक्तिशाली माणसं माझी कारकीर्द संपवण्याचे प्रयत्न करत आहेत”, असा आरोप मितालीने या पत्रातून केला.

मितालीच्या या पत्राने क्रिकेटविश्वात खळबळ माजली. यानंनतर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी बीसीसीआयला 10 पानी रिपोर्ट सादर केला.

रमेश पोवार यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले, मितालीने टीमच्या आधी स्वत:चं हित साधणे बंद करायला हवे. मला आशा आहे की, ती यावर विचार करेल आणि भारतीय महिला क्रिकेट टीमच्या हितासाठी काम करेल. तिने तिच्या खासगी कारणांसाठी फलंदाजी केली, म्हणून फलंदाजीत फ्लो येऊ शकला नाही. त्यामुळे इतर फलंदाजांवर दबाव आला. पाकिस्तान विरोधातील मॅचमध्ये टूर सिलेक्टरच्या दबावामुळे तिला खेळाची सुरुवात करु दिली. जर तिला खेळाची सुरुवात करु दिली नाही तर परत जाईल, अशी धमकी  मिताली राज देत असल्याचही पोवार यांनी सांगितलं. तरी तिने सहा ते पंधराव्या ओव्हर दरम्यान 24 चेंडूंवर केवळ 25 धावा केल्या. आयरलँडसारख्या टीम विरोधातही मितालीने 56 चेंडूंवर 51 धावा केल्या.

पाकिस्तानच्या मॅचनंतर तिची वागणूक बदलली, तिने काही खेळाडूंना सोबत घेत आपला एक ग्रुप बनवला आणि टीमपासून दूर बसू लागली. मितालीसारखी सिनीअर खेळाडू टीमला दोन ग्रुपमध्ये फूट पाडत होती, हे बघून मला अत्यंत वाईट वाटत होतं, असेही पोवार म्हणाले.

पोवार यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, ग्रुपमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये खाली आल्यावर टीम मिटिंगमध्ये सिनीअर खेळाडू असूनही मितालीने कुठलेही सजेशन दिले नाही. ती टीम योजनेनुसार स्वत:मध्ये बदल करु शकली नाही. ती स्वत:च्या हिताकरिता खेळली. अभ्यासादरम्यान गतीने धावा बनवण्यासाठी तिला संघर्ष करावा लागत होता. तिला वाकण्यात तसेच स्ट्रोक खेळण्यात समस्या येत होती. म्हणून आम्ही तानिया भाटियाकडून खेळाची सुरुवात केली. न्यूझीलंड विरोधात तानिया आणि हेमलताचा पावर प्लेमध्ये उपयोग केला.

आता रमेश पोवार यांच्या या रिपोर्टवर बीसीसीआय काय निर्णय घेणार, त्याचा मिताली राजच्या क्रिकेट करिअरवर काय परिणाम होणार, तसेच याचा भारतीय महिला क्रिकेट टीमवर काय परिणाम होईल याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

 

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.