AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉन्टिंग टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकतो का? गांगुली म्हणतो….

मुंबई : आयपीएलमधील (IPL 2019) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ही श्रेयस अय्यरची टीम मेंटॉर सौरभ गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल सध्या गुणतालिकेत टॉपवर आहे. तरुण खेळाडूंचा संघ असलेल्या दिल्ली कॅपिटलच्या प्रशिक्षकपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग सांभाळत आहे. शिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करत आहे. अशावेळी […]

पॉन्टिंग टीम इंडियाचा प्रशिक्षक बनू शकतो का? गांगुली म्हणतो....
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

मुंबई : आयपीएलमधील (IPL 2019) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ही श्रेयस अय्यरची टीम मेंटॉर सौरभ गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत आहे. दिल्ली कॅपिटल सध्या गुणतालिकेत टॉपवर आहे. तरुण खेळाडूंचा संघ असलेल्या दिल्ली कॅपिटलच्या प्रशिक्षकपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग सांभाळत आहे. शिवाय टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली मेंटॉर म्हणून मार्गदर्शन करत आहे.

अशावेळी सौरव गांगुलीने टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक म्हणून रिकी पॉन्टिंग तगडा दावेदार असल्याचं म्हटलं आहे. एका कोचमध्ये असणारे सर्व गुण पॉन्टिंगमध्ये आहेत, असं गांगुलीचं म्हणणं आहे.

आयपीएलमध्ये 2012 नंतर दिल्ली कॅपिटलचा संघ पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर टाईम्स ऑफ इंडियाने गांगुलीशी विविध मुद्द्यांवर बातचीत केली.

पॉन्टिंग टीम इंडियाचा कोच बनू शकतो का असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला. त्यावर गांगुली म्हणाला, “जर तुम्ही गुणवत्तेबाबत बोलत असाल तर निश्चितच तो एक प्रबळ दावेदार आहे. मात्र पॉन्टिंगला त्याबाबत विचारावं लागेल की, तो 8-9 महिने घरापासून दूर राहू शकेल का?”

सचिन आणि लक्ष्मणसह गांगुलीही सल्लागार समितीचा सदस्य आहे. हीच समिती टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड करते. सध्या टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा रवी शास्त्री सांभाळत आहेत. त्यांचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपणार होता, मात्र तो वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, गांगुलीला पॉन्टिंगसोबत काम करण्याचा अनुभव विचारण्यात आला. त्यावर गांगुली म्हणाला, आम्ही क्रिकेट खेळत होतो, त्यावेळी एकमेकांचे विरोधक होतो. मात्र आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत. गेल्या काही वर्षात आमचं नातं अधिक सदृढ झालं आहे.

Follow Us
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....