AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..म्हणून क्रिकेटमधून संन्यास घेतोय : मुनाफ पटेल

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मुनाफ पटेल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली. फिटनेस साथ देत नसल्याने मुनाफ गेल्या सात वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मुनाफने शेवटचा सामना 2011 सालच्या विश्वचषकात खेळला होता. मुनाफ नेमका काय म्हणाला? “मी आता 35 वर्षाचा झालो आहे. […]

..म्हणून क्रिकेटमधून संन्यास घेतोय : मुनाफ पटेल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा मुनाफ पटेल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केली. फिटनेस साथ देत नसल्याने मुनाफ गेल्या सात वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. मुनाफने शेवटचा सामना 2011 सालच्या विश्वचषकात खेळला होता.

मुनाफ नेमका काय म्हणाला?

“मी आता 35 वर्षाचा झालो आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी मी संन्यास घेण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच मला अभिमान आहे की, 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होतो.” असं स्पष्टीकरण मुनाफ पटेलने दिलं आहे.

क्रिकेटमधील पदार्पण

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे 2006 मध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात मोहाली येथे भारताच्या कसोटी संघात मुनाफला स्थान देण्यात आलं. या सामन्यात मुनाफने शानदार कामगिरी करत सात बळी टिपले होते. त्याच वर्षी इंग्लंड विरुद्धच्या वन डे सामन्यात मुनाफने पदार्पण केलं. तर 2011 साली मुनाफ टी-20 मध्ये पहिला सामना खेळला.

मुनाफची कामगिरी

मुनाफने भारताकडून खेळताना 13 टेस्ट, 70 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. टेस्टमध्ये मुनाफने 3.04 च्या इकोनॉमी रेटनं 35 विकेट घेतल्या. तर वनडेमध्ये 4.95 च्या इकोनॉमी रेटनं एकूण 86 विकेट काढल्या आहेत.

तसेच, टी-20 या छोट्या सामन्याच्या सामन्यामध्ये मुनाफला अधिक संधी न मिळाल्याने केवळ तीन सामन्यात चार बळी घेता आले आहेत. 2011 साली झालेल्या विश्वचषकात मुनाफने 11 विकेट घेतल्या होत्या.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.