AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती, पाहा, T20चा संघ

29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी तो वेस्ट इंडिजला जाणार नाही.

T 20 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती, पाहा, T20चा संघ
| Updated on: Jul 14, 2022 | 2:53 PM
Share

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. 29 जुलैपासून सुरू होणाऱ्या या पाच सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता तो टी-20 किंवा वनडे मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तर के. एल. राहुल आणि कुलदीप यादव यांचे संघात राहणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. कोहलीशिवाय नंबर-1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल वनडेत बुमराहने 19 धावांत 6 विकेट घेतल्या होत्या. तसेच, शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचेही संघात पुनरागमन झाले आहे.

रविचंद्रन अश्विनचे संघात पुनरागमन

लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर रविचंद्रन अश्विनचेही संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. के. एल. राहुलचा समावेश त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. राहुल आणि कुलदीपला फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कप्तान), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

ट्विट करत बीसीसीआयची माहिती

वेस्ट इंडिज विरुद्ध टी-20 मालिका

  1. 29 जुलै, पहिला T20
  2. 1 ऑगस्ट, दुसरा T20
  3. 2 ऑगस्ट, तिसरा T20
  4. 6 ऑगस्ट, चौथा T20
  5. 7 ऑगस्ट, पाचवा T20

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.