टीम इंडियाच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये हाहाकार, कॅप्टन निकोलस पूरन बोलायलाही तयार नाही

टीम इंडिया सध्या इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आहे. वनडे सीरीजचे दोन सामने बाकी आहेत. ही सीरीज संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल.

टीम इंडियाच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये हाहाकार, कॅप्टन निकोलस पूरन बोलायलाही तयार नाही
nicholas pooran
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 1:03 PM

मुंबई: टीम इंडिया सध्या इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आहे. वनडे सीरीजचे दोन सामने बाकी आहेत. ही सीरीज संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होईल. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज (India west indies Tour) मध्ये पोहोचण्याआधी तिथल्या क्रिकेट मध्ये हाहाकार उडाला आहे. कॅरेबियाई संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. कॅप्टन निकोलस पूरन चिंतेमध्ये आहे. पूरनच्या चिंतेच कारण आहे भारताचा शेजारी बांगलादेश. वनडे सीरीज मध्ये बांगलादेशने पूरन अँड कंपनीला (WIvsBAL) त्याच्याच घरात पराभवाचा तडाखा दिला आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. बांगलादेशच्या टीमकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. 13 जुलैला दुसऱ्या वनडेत बांगलादेशने वेस्ट इंडिजवर 9 विकेटने मोठा विजय मिळवला. 16 जुलैला सीरीज मधला शेवटचा सामना खेळला जाईल.

तो चर्चेता विषय बनलाय

दुसरी वनडे जिंकून बांगलादेशने सीरीज जिंकली. पण ज्या वाईट पद्धतीने वेस्ट इंडिजला हरवलं तो चर्चेता विषय बनलाय. बांगलादेशने प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजला 108 धावांवर रोखलं. त्यांना पूर्ण 50 षटकही खेळू दिलं नाही. 35 षटकात त्यांचा डाव संपवला. 108 ही वेस्ट इंडिजची आपल्याच घरातील सर्वात कमी धावसंख्या आहे.

दोन फिरकी गोलंदाजांची महत्त्वाची भूमिका

दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजची इतकी खराब हालत करण्यामध्ये मेहदी हसन आणि नसुम अहमद या दोन फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका आहे. हसनने चार आणि अहमदने तीन विकेट घेतल्या. बांगलादेशने 109 धावांचे लक्ष्य 21 षटकातच पार केलं.

खूप वाईट आणि कठीण दिवस होता

टीम इंडियाच्या दौऱ्याआधी वेस्ट इंडिजचा मायदेशात झालेला पराभव हे चांगले संकेत नाहीत. कॅप्टन निकोलस पूरन बोलताना हे दु:ख दिसून आलं. “खूप वाईट आणि कठीण दिवस होता. मला या बद्दल बोलायचं नाही. आमचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरलेत” अंस पूरन म्हणाला.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.