सूर्याने जे कमावलं ते श्रेयसने एका झटक्यात गमावलं, ‘सरपंच साहब’च्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे मोठे नुकसान होत आहे. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदात भारतीय संघ टी-20 मालिका गमावत असल्याने आता त्याचा मोठा भुर्दंड बसत आहे.

सूर्याने जे कमावलं ते श्रेयसने एका झटक्यात गमावलं, सरपंच साहबच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला मोठे नुकसान; नेमकं काय घडलं?
shreyas iyer
| Updated on: Jul 06, 2026 | 2:31 PM

भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघाची सुरुवात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात चांगली झालेली पाहायला मिळत नाहीये. श्रेयसच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला उतरती कळा लागली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चारपैकी तीन सामने गमावले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आयसीसी क्रमवारीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. जर टीम इंडियाने आणखी सामने गमावले, तर आणखी मोठे नुकसान होऊ शकते.  श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकलेला नाही आता त्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकण्यासाठी आतुर आहे. जेव्हा टीम इंडिया आयर्लंडमध्ये दाखल झाली, तेव्हा ते मालिका जिंकतील अशी मोठी अपेक्षा होती. भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात धक्का बसला. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही पराभव झाला. पहिल्यांदाच टीम इंडिया एकही सामना न जिंकता आयर्लंडमधून परतली. यानंतर इंग्लंडचा दौरा सुरू झाला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि टीम इंडिया दुसरा सामना चार गडी राखून हरली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील क्रमवारीतील अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. आता त्याचा फटका भारतीय संघाला आयसीसी क्रमवारीत बसला आहे. जेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका सुरू होणार होती, तेव्हा आयसीसी टी20 क्रमवारीत भारतीय संघाचे रेटिंग 272 होते, तर इंग्लंडचे रेटिंग 262 होते. मात्र, आजच्या तारखेनुसार भारताचे रेटिंग घसरून 271 झाले आहे, तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरून 264 पर्यंत वाढले आहे. याचा अर्थ, भारत आणि इंग्लंड यांच्यातील रेटिंगमधील अंतर, जे पूर्वी 10 गुणांचे होते, ते आता केवळ सात गुणांपर्यंत कमी झाले आहे.

मालिकेत अजून तीन सामने बाकी आहेत. भारतीय संघासमोर आणखी एका मालिका पराभवाची शक्यता तर आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या क्रमवारीत घसरण होण्याचा धोकाही आहे. जर भारतीय संघ आणखी एक सामना हरला आणि इंग्लंड जिंकला, तर हे रेटिंगमधील अंतर आणखी कमी होईल, ज्यामुळे भारतीय संघाच्या मालिका जिंकण्याच्या संधींना आणखी धोका निर्माण होईल. मालिकेतील तिसरा सामना आता मंगळवार, 7 जुलै रोजी खेळला जाईल.

Follow Us