AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: तिसऱ्या सामना जिंकण्यासाठी श्रेयसला उचलावे लागणार मोठं पाऊल; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये ‘तो’ एक निर्णय घ्यावाच लागणार

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी-20 सामना रंगणार आहे. या सामन्यात जर एका खेळाडूला संघात स्थान मिळाले नाही तर भारतीय संघ जिंकण्याची शक्यता नाकारु शकत नाही. कर्णधार श्रेयस अय्यर मोठा निर्ण. घेईलच.

IND vs ENG: तिसऱ्या सामना जिंकण्यासाठी श्रेयसला उचलावे लागणार मोठं पाऊल; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये 'तो' एक निर्णय घ्यावाच लागणार
ind vs eng
| Updated on: Jul 06, 2026 | 12:52 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघ तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तिसरा सामना जर भारतीय संघाने जिंकला नाही तर मालिका गमावण्याचा धोका आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात 191 धावांचे लक्ष्य ठेवूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. तिसरा सामना उद्या, 7 जुलै रोजी ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. तिसरा सामना खेळण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरेल तेव्हा एका खेळाडूला संघात स्थान देणार नाही याची शक्यता नाकारु शकत नाही.

मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला 191 धावांचे लक्ष्य गाठणे आव्हानात्मक ठरत होते. पण रवी बिश्नोईच्या एका षटकाने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. 16 व्या षटकाच्या अखेरीस इंग्लंडला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 49 धावांची गरज होती. बिश्नोई 17 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि त्याने दोन नो-बॉलसह 29 धावा दिल्या. यापूर्वीही त्याने नो-बॉल टाकले होते. तीन वेळा तीच चूक करणे हे शिस्तीचा अभाव दर्शवते. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनेही कबूल केले की हे षटक सामन्याचे कलाटणी देणारे ठरले. त्यामुळे, फिरकी गोलंदाजाला पुढच्या सामन्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

रवी बिश्नोईच्या जाण्यामुळे वॉशिंग्टन सुंदर आणि प्रिन्स यादव यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. खेळपट्टीनुसार संघ व्यवस्थापन अंतिम 11 खेळाडूंमध्ये बदल करू शकते. जर फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असेल, तर सुंदर खेळताना दिसू शकतो. तो फलंदाजीचा एक पर्यायही उपलब्ध करून देतो. याशिवाय, जर परिस्थिती वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असेल, तर प्रिन्स यादवला संघात स्थान दिले जाऊ शकते. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये 22 धावा देऊन 3 बळी घेतले होते.

भारताला इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी-20 सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. आयर्लंडकडून झालेल्या मानहानीकारक मालिका पराभवानंतर, त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. पराभव झाल्यास नवीन कर्णधार श्रेयस अय्यरभोवतीचे प्रश्न आणखी तीव्र होतील. त्याने सूर्यकुमार यादवची जागा घेतली आहे. त्याच्या कर्णधारपदी भारताने 2026 च्या टी20 विश्वचषकासह 52 पैकी 42 सामने जिंकले.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी