AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन पावसात निवडणुकीचा ‘धुरळा’ उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर

पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या ३ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने या संदर्भात अधिसूचना जारी केली.

ऐन पावसात निवडणुकीचा 'धुरळा' उडणार; कोणत्या 3 जागांवर पोटनिवडणुका होणार? अधिकृत माहिती समोर
| Updated on: Jul 06, 2026 | 2:11 PM
Share

देशातील काही भागात जोरदार पाऊस सुरू असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुखेंदु शेखर रॉय, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बडाईक यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तीन राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर पोटनिवडणूक होणार असून निवडणूक आयोगाकडून त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सुखेंदु शेखर रॉय यांनी 8 जून 2026 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर सुष्मिता देव यांनी 10 जून 2026 रोजी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याच्या दुसर्‍या दिवशी प्रकाश चिक बडाईक यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला. या तिन्ही जागांचा कार्यकाळ अनुक्रमे 2029 आणि 2030 सालापर्यंत आहेत. आता तिन्ही जागेसाठी 24 जुलै 2026 रोजी निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तिन्ही जागेसाठी 7 जुलै 2026 ते 14 जुलै 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै रोजी आहे. त्यानंतर या जागांसाठी मतदान 24 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 5 वाजता होईल.

निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे की, बॅलेट पेपवर उमेदवाराला पसंती दर्शवण्यासाठी रिटर्निंग ऑफिसरद्वारे जांभळ्या रंगाचा स्केच पेन वापरावा लागेल. कोणत्याही परिस्थिती दुसरा स्केचपेन वापरता येणार अधिसूचना जारी केल्या आहेत. सभागृहातील पोटनिवडणुकीच्या रिक्त जागा स्वतंत्र्य म्हणून गणल्या जातात. त्यामुळे प्रत्येक रिक्त जागेसाठी स्वतंत्र्य अधिसूचना जारी केली जाते.

पश्चिम बंगालमध्ये राजकारण फिरलं

तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण फिरलं आहे. मागील दशकापासून सत्ता गाजवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भाजपने सत्तेवरून खाली खेचलं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता मिळवली. भाजपला सत्ता मिळाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये फोडाफोडीचं राजकारणही सुरू झालं आहे. निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे जवळपास 58 आमदार फुटले. त्यानंतर काही खासदार देखील फुटले. फुटीर आमदार-खासदारांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?