AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: टीम इंडियाचे हे 3 खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेत खेळाडूंना पाणी देण्याचं काम करणार ?

कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंना मिळाली नाही संधी, आता खेळाडूंना देणार पाणी

IND vs BAN: टीम इंडियाचे हे 3 खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेत खेळाडूंना पाणी देण्याचं काम करणार ?
Team india
| Updated on: Dec 12, 2022 | 8:39 AM
Share

मुंबई : टीम इंडिया (IND) सध्या बांगलादेशमध्ये (BAN) आहे, टीम इंडियाची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आता परवापासून कसोटी मालिका (Test Match) सुरु होणार आहे. त्या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. कारण टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी केएल राहूलला देण्यात आली आहे. केएल राहूल आणि प्रशिक्षक राहूल द्रविड हे कोणत्या खेळाडूला संधी देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

टीम इंडियाचा गोलंदाज कुलदीप यादव याला टीम कसोटी मालिकेत संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल यांना टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला दोन कसोटीमध्ये खेळाडूंना पाणी देण्याचं काम करावं लागणार आहे.

शार्दुल ठाकुर हा टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज आहे. परंतु बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी संधी देण्यात आल्यामुळे शार्दुल ठाकुर या गोलंदाजाला खेळाडूंना पाणी द्यावे लागणार आहे.

केएस भरत हा टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये आहे. त्याला विकेटकीपर म्हणून टीममध्ये सामिल करण्यात आलं आहे. परंतु ऋषभ पंतला संधी देण्यात आल्यामुळे त्याला सुद्धा टीम इंडियामध्ये संधी मिळालेल्या खेळाडूंना दोन कसोटीमध्ये पाणी देण्याचं काम करावं लागणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...