AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने अफगाणिस्तान विरुद्ध स्फोटक सुरुवात केली होती. त्याने अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्याला सूर गवसल्याचे संकेत मिळाले होते. पण आज श्रीलंकेविरुद्ध पुन्हा वैभव सूर्यवंशी फेल ठरला. सिनियर टीम इंडियात संधी तर त्याला मिळालीय. पण त्यासाठी त्याची बॅट तळपणं सुद्धा तितकच गरजेच आहे.

Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल
Vaibhav Sooryavanshi Image Credit source: PTI
| Updated on: Jun 15, 2026 | 10:55 AM
Share

टीम इंडियाचा स्टार प्लेयर वैभव सूर्यवंशी आज श्रीलंका ए विरुद्ध तिसऱ्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत अ आणि श्रीलंका अ संघात सामना सुरु आहे. श्रीलंका अ ने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशांच्या ‘अ’ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. कारण फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याची लढाई अजून रोमांचक बनली आहे. श्रीलंका ए विरुद्ध प्रभसिमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशीची जोडी मैदानात उतरली. वैभवने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. पण त्याला ती लय पकडून ठेवता आली नाही. वैभव सूर्यवंशी 14 चेंडूत 21 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. वैभवने 3 चौकार आणि एक षटकार लगावला.

वैभव सूर्यवंशी चौथ्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने प्रभसिमरन सिंह सोबत पहिल्या विकेटसाठी 29 धावा जोडल्या. श्रीलंका ए विरुद्ध पहिल्या सामन्यात सुद्धा वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला होता. त्यावेळी तो 14 धावांवर बाद झालेला. नंतर अफगाणिस्तान अ विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात वैभवने 22 चेंडूत 44 धावा फटकावून सूर गवसल्याचे संकेत दिले होते. त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीसाठी हा दौरा खूप महत्वाचा आहे. त्याची सिनियर टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात वैभवला सिनियर टीम इंडियाकडून संधी मिळू शकते. पण त्यासाठी सध्या सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत त्याने दमदार प्रदर्शन करणं गरजेचं आहे.

प्रदर्शनात सातत्य आवश्यक

आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने 16 सामन्यात 750 पेक्षा जास्त धावा केल्या. आपली निवड करण्यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या निवड समितीला भाग पाडलं आहे. तो अवघ्या 15 वर्षांचा असून टॅलेंट त्याच्यात कुटून भरलेलं आहे. टीम इंडियात स्थान टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या प्रदर्शनात सातत्य आवश्यक आहे. म्हणून या दौऱ्यात वैभवची बॅट तळपणं खूप गरजेचं आहे. दांबुलाचा पीच फलंदाजीसाठी अनुकूल मानला जातो. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना पीचकडून काही मदत मिळू शकते. पण नंतर खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल होत जाईल. मधल्या षटकात स्पिन गोलंदाज प्रभावी ठरु शकतात. त्यांना पीचकडून टर्न मिळू शकतो. त्यामुळे धावगती नियंत्रणात ठेवता येईल.

Follow Us
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल