AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : टीम इंडिया T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर, चाहत्यांना का आठवण येतेय महेंद्र सिंह धोनीची?

इंग्लडने टीम इंडियाला हरवल्यानंतर आजोबांपासून नातवापर्यंत सर्व फॅन्स का म्हणतायत आता महेंद्र सिंह धोनी असायला हवा होता?

T20 World Cup 2022 : टीम इंडिया T20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर, चाहत्यांना का आठवण येतेय महेंद्र सिंह धोनीची?
इंग्लडने टीम इंडियाला हरवल्यानंतर आजोबांपासून नातवापर्यंत सर्व फॅन्स का म्हणतायत आता महेंद्र सिंह धोनी असायला हवा होता?
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 11, 2022 | 8:57 AM
Share

नवी दिल्ली : टीम इंडियाची (IND) सेमीफायनलच्या आगोदर विश्वचषक स्पर्धेच (T20 World Cup 2022) चांगली कामगिरी राहिली आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर इंग्लंडविरुद्ध (ENG) टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. कारण कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाकडून अनेक चुका झाल्या आहेत. तसेच फलंदाजांनी चांगली खेळी केली नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच होणार आहे. विशेष म्हणजे कालची मॅच संपल्यानंतर चाहत्यांना धोनीची आठवण झाली आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनीची यशस्वी कर्णधार म्हणून ओळख आहे. ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता, त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती टीम इंडियावर आली होती. 130 धावा असताना सुद्धा धोनीने आपल्या चातुर्य बुद्धीने टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता.

त्यावेळी मैदानात असताना धोनीने खेळाडूंना एका सल्ला दिला होता. “वरती पाहू नका, देव तुम्हाला वाचवायला येणार नाही. तुम्हाला स्वत:ला मैदानात चांगला खेळ करायचा आहे. आणि ती वेळ आता आली आहे. आपण एक नंबर होतो आणि आहोत. काहीही करुन आपल्याला मॅच जिंकायची आहे.”

महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना ज्यावेळी टीमचा पराभव व्हायचा. त्यावेळी त्याची जबाबदारी महेंद्रसिंग धोनी स्वत:च्या अंगावर घेत होता. तसेच टीम जिंकल्यानंतर त्याचं श्रेय खेळाडूंना देत होता. त्याचं कारण असं होतं की मी टीमचं नेतृत्व करतो. त्यामुळे चुकीचं काही जरी झालं, तरी त्याची जबाबदारी माझी आहे असं धोनीचं मतं होतं.

धोनीने टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. त्यामुळे कालची मॅच पाहिल्यानंतर आजोबांपासून नातवापर्यंत सर्व फॅन्स का म्हणतायत आता महेंद्र सिंह धोनी असायला हवा होता.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.