AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाचा विश्वचषक सैनिकांसाठी जिंकून आणू : विराट कोहली

मुंबई : इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलाय. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. हा विश्वचषक माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक असेल, असंही विराट म्हणाला. 30 मेपासून विश्वचषकाची सुरुवात […]

यंदाचा विश्वचषक सैनिकांसाठी जिंकून आणू : विराट कोहली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 21, 2019 | 4:34 PM
Share

मुंबई : इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलाय. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. हा विश्वचषक माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक असेल, असंही विराट म्हणाला.

30 मेपासून विश्वचषकाची सुरुवात होत आहे. विराट कोहलीचा हा तिसरा विश्वचषक असला तरी कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असेल, असं तो म्हणाला. या विश्वचषकात मोठ्या धावसंख्या होण्याचा अंदाजही व्यक्त केला. शिवाय चौथ्या क्रमांकावर कुणाला उतरवायचं यावरही कोहलीने भाष्य केलं.

सध्याच्या भारतीय संघ अत्यंत संतुलित असल्याचं रवी शास्त्री म्हणाले. आपण जीव ओतून खेळलो तर विश्वचषक आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या विश्वचषकात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंना एकत्र येण्यासाठी वेळ मिळणार आहे. तुम्ही कुठूनही प्रेरणा घेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही भारतीय सैन्याबद्दल बोला, तुम्हाला प्रेरणा मिळते. आम्ही सैन्यासाठी काही करु शकलो तर आम्हाला आनंद आहे. विश्वचषकात आम्ही एकाच संघाविषयी विचार करु शकत नाही. आमची तीव्रता आम्हाला संपूर्ण विश्वचषक होईपर्यंत जपून ठेवायची आहे. आमच्या पातळीवर आम्ही परिपूर्ण असू, प्रतिस्पर्धी संघाविषयी विचार करणार नाही, असं विराट म्हणाला.

भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, अनुभवी महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. शिवाय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केदार जाधवही संघात आहेत. विशेष म्हणजे जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्यासारखे गोलंदाज जमेची बाजू असतील. रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव हे फॉर्मात असणारे गोलंदाजही जमेची बाजू ठरतील. आयपीएलमध्ये सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.

30 मे रोजी भारताचा दक्षिण आफ्रिकेसोबत या विश्वचषकातला पहिला सामना होईल. पण त्यापूर्वी 25 मे रोजी न्यूझीलंड आणि 28 मे रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे. या सामन्यातूनच उभय संघांना खेळपट्टीचा अंदाज घेता येईल.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली