AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात स्मार्टफोन झाले महाग किमती 2000 रुपयांपर्यंत वाढल्या, आगामी स्मार्टफोनच्या किमतीवरही होणार परिणाम

मेमरी आणि चिप्स सारख्या स्टोरेज कंपोनंट्सच्या किमती वाढल्यामुळे भारतात स्मार्टफोन खरेदी करणे महाग झाले आहे. त्यामुळे फोनच्या किमती 2000 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. याचा परिणाम 2025 आणि 2026 मध्ये लाँच होणाऱ्या आगामी फोनच्या किमतींवरही होईल. चला जाणून घेऊयात कोणत्या कंपनीने किमतीत किती वाढ केली आहे.

भारतात स्मार्टफोन झाले महाग किमती 2000 रुपयांपर्यंत वाढल्या, आगामी स्मार्टफोनच्या किमतीवरही होणार परिणाम
india Smartphones prices have increased by up to Rs 2000 upcoming smartphones will also be affectedImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Nov 28, 2025 | 7:58 PM
Share

तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर आता तुमच्या खिशावर मोठा फटका बसणार आहे, कारण भारतात फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. भारतातील अनेक स्मार्टफोन कंपन्यानी त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती 2000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मेमरी आणि चिप्स सारख्या स्टोरेज कंपोनंट्सच्या किमतीत सतत वाढ झाल्यामुळे फोन महाग झाले आहेत. त्यामुळे याचा परिणाम आता या वर्षी लाँच होणाऱ्या फोनच्या किमतींमध्ये दिसून येईल. तर आजच्या लेखात आपण कोणत्या कंपनीने किमतीत किती वाढ केली आहे ते जाणून घेऊयात.

या कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या किमती वाढल्या

कंपोनंट्सच्या किमतीत वाढ झाल्याने याचा परिणाम आता मोबाईल खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. द हिंदूमधील एका वृत्तानुसार, Vivo T Series आणि Vivo T4x 5G सिरीजच्या स्मार्टफोनच्या किमतीत 1,500 रूपयांची वाढ झाली आहे. तर Oppo Reno 14 सिरीज आणि Oppo F31 सिरीज असलेल्या स्मार्टफोन किमतीतही 1,000 ते 2,000 रूपयापर्यंत वाढ झाली आहे.

Samsung A17 या स्मार्टफोनच्या किमतीत 500रुपयांची वाढ केली आहे. त्यात सॅमसंग कंपनी त्यांचा फोन खरेदीवर चार्जर देत नाही, त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त 1,300 रुपये द्यावे लागतील. याचा अर्थ सॅमसंग फोन खरेदीदारांना आता अंदाजे 1,800 रुपये जास्त द्यावे लागतील. एआयएमआरए (ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन) ने जागतिक स्टोरेज कंपोनंट्सच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण असल्याचे सांगून किमतीत सतत वाढ होत राहण्याचा इशारा दिला आहे.

2026 च्या अखेरीपर्यंत किमती वाढतच राहतील

OEMs ने शेअर केलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2025 पासून मेमरी आणि चिप कंपोनंट्सच्या किमती वाढत आहेत आणि मेमरी पुरवठ्यातील कमतरतेमुळे ही समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. उद्योग संशोधनानुसार 2026 च्या अखेरपर्यंत मेमरी, चिप आणि कच्च्या मालाच्या किमती वाढत राहण्याची अपेक्षा आहे.

एआयमुळे स्टोरेज कंपोनंट्सच्या मागणी वाढत आहे

मशीन लर्निंग सिस्टीम आणि डेटा सेंटर्सना पॉवर देण्यासाठी एआय उच्च दर्जाच्या मेमरीची मागणी वाढवत आहे. एकेकाळी फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स आता जनरेटिव्ह एआयला पॉवर देण्यासाठी वाढत्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. त्यामुळे याचा परिणाम आता मोबाईल खरेदी करणाऱ्यांवर होणार आहे. वाढत्या मोबाईलच्या किंमती लक्षात घेता आता ग्राहकांनाही त्यांचा बजेट वाढवावा लागणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत