AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलणं चूक की बरोबर?

मोबाइल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलू नये, हो, अगदी बरोबर म्हटलं आहे. एवढंच नाही तर फोन हाताळूसुद्धा नये.

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलणं चूक की बरोबर?
| Updated on: May 12, 2021 | 11:56 PM
Share

मुंबई : मोबाइलची बॅटरी चार्जिंग होत असताना फोनवर बोलू नये, हो, अगदी बरोबर म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यावेळी त्यावर गेम खेळू नये किंवा मोबाईल हाताळूसुद्धा नये. याचं कारण म्हणजे फोन चार्ज होत असतो तेव्हा तो आपल्या घरातील विद्युत उपकरणाला जोडलेला असतो अर्थात तेव्हा आपल्या विद्युत बोर्डमधून विजेचा प्रवाह एका अशा उपकरणात प्रविष्ट होत असतो जो मुळातच विद्युतग्राही आहे. (speaking on phone while charging Is right or wrong?)

आपला मोबाईल चार्ज होत असताना विद्युत बोर्डातून निघणारा विद्युत दाब केवळ मोबाईलच्या बॅटरीमध्येच नव्हे तर काही प्रमाणात त्या मोबाईलच्या वरच्या भागातही प्रवाहित होत असतो. मोबाईल हे एक प्रकारे चुंबकच आहे, त्यामुळे आपला मोबाईल चार्ज होत असतो तेव्हा त्यात एक प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड तयार होते, त्या फिल्डमुळे फोन मध्ये किंचित कंपनंदेखील निर्माण होत असतात.

हा प्रयोग नक्की करुन बघा

वर लिहिलेल्या माहितीवर तुमचा विश्वास बसत नसेल तर तर एक प्रयोग जरूर करून बघा. तुमचा फोन चार्जिंगला लावलेला असेल तेव्हा त्याला सवयी प्रमाणे हातात न घेता एका हाताने हलक्याने उचला आणि दुसऱ्या तळ हातावर किंवा तळ हाताच्या मागच्या बाजूला हळूवारपणे घासा, किंवा फोनच्या मागच्या बाजूवर (रियर पॅनेलवर) हळुवार बोटे फिरवा, आता तुमच्या लक्षात येईल की, आपल्या हातावर फोन घासला जात असतांना त्यात हलकी कंपनं निर्माण होत आहेत. हेच ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आहे जे तरंगाच्या रुपात आपल्याला जाणवतात.

विस्फोट होऊ शकतो

आता मुळातच जी वस्तू विद्युतग्राही आहे आणि ती विद्युतग्रहण करीत आहे अशा वेळी जर आपण त्या वस्तूचा वापर करायला सुरुवात केली तर त्या विद्युत तरंगामध्ये आणखीन वाढ व्हायला लागते. आपल्याला तर माहीतच आहे की पृथ्वीवरील तरंग अति वाढत गेल्यास काय होतं? अगदी तसंच त्या बॅटरी मध्ये देखील होतं. म्हणजेच विस्फोट होणं.

यात दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे फोन चार्ज होत असताना जर कोणाचा फोन आला तर, विद्युतग्राही वस्तू मुळातच विद्युतग्रहण करीत असतानाच फोन येणं म्हणजेच अवकाशातून देखील कंपन्याच्या टॉवरच्या माध्यमातून पुन्हा विद्युत तरंग फोनकडे आकर्षित होतात. म्हणजेच त्या फोन च्या बॅटरीवर पुन्हा दबाव वाढतो. अशाच जर तुम्ही तो फोन उचलला, तर तो दबाव अति प्रमाणात वाढू लागतो.

रेडिएशनचा धोका

एवढेच नव्हे तर फोनच्या माध्यमातून रेडिएशनचा धोका निर्माण होतो. त्यातही आपण करीत असलेल्या इंटरनेटचा वापर आणि हे रेडिएशन आपल्या मेंदूवर ताबडतोब हल्ला करीत असतात. आपण अशा रेडिएशनच्या सान्निध्यात येतो तेव्हा विद्युत दबाव आणि रेडिएशनमुळे आपल्या मेंदूच्या नसांना अतिशय तीव्र स्वरूपाचा धक्का बसून त्या फाटण्याची देखील शक्यता निर्माण होते.

त्यातही आपला मोबाईल नेहमी आपल्या हातात अर्थात चेहऱ्याच्या जवळच असतो आणि अशातच जर फोनवर विद्युत दाब वाढला तर बॅटरी फुटून आपला शरीराला गंभीर अपाय होऊ शकतो, एवढेच नव्हे तर यात जीव सुद्धा गमावला लागू शकतो. म्हणून फोन पूर्ण चार्ज होत नाही, तोपर्यंत फोनचा वापर टाळणे फारच गरजेचं आहे.

इतर बातम्या

तब्बल 7 इंचांचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, दमदार कॅमेरा आणि खूपच कमी, मेड इन इंडिया फोनची सर्वत्र चर्चा

OTT म्हणजे काय? भारतातील OTT चे लोकप्रिय प्रकार आणि प्लॅटफॉर्म कोणते? जाणून घ्या सर्वकाही

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

(Is it Dangerous to Talk on Phone While its Charging?)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.