AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arcedior इंटेरीअर स्टार्टअपची कहाणी, १० वर्षांत विवेक अग्रवाल यांनी कमावलं जगात नाव

विवेक अग्रवाल यांना त्यांच्या मिशनमध्ये पत्नी श्रृती यांनी मदत केली. पती डिझायनर होते, तर पत्नी इंजिनीअर होती. या जोडीने इंटेरीअरसंबंधी वेगळा विचार केला.

Arcedior इंटेरीअर स्टार्टअपची कहाणी, १० वर्षांत विवेक अग्रवाल यांनी कमावलं जगात नाव
| Updated on: May 20, 2023 | 9:47 PM
Share

नवी दिल्ली : देशातील प्रमुख इंटेरीअर स्टार्टअपची कहाणी प्रेरणादायी आहे. या कंपनीचे नाव आर्सिडीअर आहे. या कंपनीचे संस्थापक विवेक अग्रवाल आहेत. त्यांनी जोरात काम सुरू केलं. कमी वेळात व्यवसायात उभारी घेतली. विवेक यांना इंटेरीअर डिझायनिंगमध्ये आवड होती. त्यांनी मिशन म्हणून या कामची सुरुवात केली. विवेक अग्रवाल यांना त्यांच्या मिशनमध्ये पत्नी श्रृती यांनी मदत केली. पती डिझायनर होते, तर पत्नी इंजिनीअर होती. या जोडीने इंटेरीअरसंबंधी वेगळा विचार केला.

कंपनी तयार करण्यापूर्वी विवेक आणि श्रृती यांनी याची मागणी आणि बंधन याचा अभ्यास केला. काही देशांमध्ये त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर वेगळं काहीतरी करण्याचा विचार त्यांनी केला. स्टार्टअपच्या सुरुवातीला त्यांना काही अडचणी आल्या.

इंटेरीअर स्टार्टअप सोपं होतं. परंतु, हे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहचवणं मुश्कील होतं. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्लॅटफार्मची मदत घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रोडक्टला बाजारात ओळख मिळाली.

इंटेरीअर डिझायनिंगमध्ये क्रांती आणण्याचा विचार

इंटेरीअर डिझायनिंगमध्ये बाजारात स्पर्धा खूप आहे. प्रत्येकजण आपला बंगला, घर किंवा हॉटेल, रेस्टारंट आदी इंटेरीअर डिझानिंगने सजवण्याची इच्छा बाळगतो. यामुळे इंटेरीअर डिझायनिंग, प्रोजेक्ट ऑनर्स, आर्किटेक्ट यांनी क्रांती घडवली. आर्सिडीअरचे क्युरेटर प्रोडक्ट विशिष्ट डिझायनिंगसाठी बाजारात स्थापित झाले आहे.

देशापाठोपाठ विदेशात पाऊल

आर्सिडीअरने सुरुवातीला भारतात हॉटेल, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं. त्यानंतर आपल्या योजनांचा विस्तार केला. भारतात यश मिळाल्यानंतर कंपनीने मध्य पूर्व ऑफ्रिका आणि अमेरिका बाजारावर लक्ष केंद्रित केलं. गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान कामात आले.

यानंतर कित्तेक देशात या कंपनीने उत्पादन पाठवले. डिलीव्हरी सर्व्हिस दुरुस्त केली. ई कॉमर्सच्या माध्यमातून कंपनीने सुधारणा केली. सध्या कंपनी शेकडो करोड रुपयांची झाली आहे. यामागे या दोन्ही पती-पत्नीची मेहनत आहे. दोघांनीही मेहनत करून कंपनीला मोठं केले. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून चांगली सेवा दिली. त्यामुळे त्यांची ही कंपनी आता जगात चांगले काम करत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.