AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 2019 ला सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाणच मुख्यमंत्री?

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आजपासून 48 जागांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक चव्हाण असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात. […]

राज्यात 2019 ला सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाणच मुख्यमंत्री?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Nov 15, 2018 | 10:35 AM
Share

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आजपासून 48 जागांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक चव्हाण असण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात. राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीला काँग्रेसचा चेहरा अशोक चव्हाण असणार यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे.

अशोक चव्हाण सध्या नांदेडचे खासदार आहेत. मोदी लाटेतही निवडून येणारे ते हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्यासह दुसरे खासदार आहेत. पण आता मुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाणांना राज्यात ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. आघाडी करुन लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी याआधीच जाहीर केलं आहे. पण दोघांमध्ये मोठा भाऊ कोण आणि मुख्यमंत्रीपदाबाबत काय, हे दोन्ही पक्षांमध्ये अजून ठरलेलं नाही. हे सर्व ठरण्याअगोदरच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचीही तयारी केली आहे.

काँग्रेसकडून राज्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या जनसंघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेची सुरुवात झाली. विविध टप्प्यांमध्ये राज्यभरात ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची जबाबदारी अशोक चव्हाणांकडे देण्यात आली आहे.

डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. पण आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Follow Us
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!