AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात 2019 ला सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाणच मुख्यमंत्री?

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आजपासून 48 जागांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक चव्हाण असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात. […]

राज्यात 2019 ला सत्ताबदल झाल्यास अशोक चव्हाणच मुख्यमंत्री?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Nov 15, 2018 | 10:35 AM
Share

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस आजपासून 48 जागांचा आढावा घेणार आहे. 2019 ला राज्यात सत्ताबदल झाल्यास काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अशोक चव्हाण असण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात. राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीला काँग्रेसचा चेहरा अशोक चव्हाण असणार यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे.

अशोक चव्हाण सध्या नांदेडचे खासदार आहेत. मोदी लाटेतही निवडून येणारे ते हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्यासह दुसरे खासदार आहेत. पण आता मुख्यमंत्रीपदासाठी अशोक चव्हाणांना राज्यात ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहे. आघाडी करुन लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी याआधीच जाहीर केलं आहे. पण दोघांमध्ये मोठा भाऊ कोण आणि मुख्यमंत्रीपदाबाबत काय, हे दोन्ही पक्षांमध्ये अजून ठरलेलं नाही. हे सर्व ठरण्याअगोदरच काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचीही तयारी केली आहे.

काँग्रेसकडून राज्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या जनसंघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेची सुरुवात झाली. विविध टप्प्यांमध्ये राज्यभरात ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची जबाबदारी अशोक चव्हाणांकडे देण्यात आली आहे.

डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. पण आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Aaditya Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप