AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावध राहा! तरुणांमध्ये वाढतेय या प्रकारच्या दारूची क्रेझ, पेगवर पेग रिचवण्याचं प्रमाण वाढलं; आकडे पाहून डोळे विस्फारतील

पर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टूबॉल यांचं म्हणणं आहे की, भारतात उत्पन्न वाढलं आणि विचारधारा बदलली, त्यामुळे दारूच्या खपात मोठा बदल दिसतोय. दरवर्षी सुमारे २ कोटी नवे तरुण कायदेशीर वयात (लीगल ड्रिंकिंग एज) येतायत आणि त्यांची पसंती आता सामान्य दारूपेक्षा प्रीमियम ब्रँड्सकडे वळली आहे.

सावध राहा! तरुणांमध्ये वाढतेय या प्रकारच्या दारूची क्रेझ, पेगवर पेग रिचवण्याचं प्रमाण वाढलं; आकडे पाहून डोळे विस्फारतील
AlcoholImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 03, 2025 | 7:25 PM
Share

भारतात बदलती जीवनशैली आता लोकांच्या ‘ग्लास’पर्यंत पोहोचली आहे. पूर्वी दबक्या आवाजात होणारी दारूची चर्चा आता ड्रॉइंगरूम आणि सोशल गॅदरिंग्जचा महत्त्वाचा भाग बनली आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालाने आणि उद्योगातील दिग्गजांच्या वक्तव्याने हे सिद्ध केलंय की, भारतीय समाजात दारू पिण्याबाबतची जुनी परंपरा वेगाने मोडली जातेय. हा बदल फक्त सामाजिक नाही, तर आर्थिक क्षेत्रातही घडतोय.

महागड्या दारूचा बाजार वेगाने वाढतोय

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, फ्रेंच कंपनी ‘पर्नोड रिकार्ड इंडिया’चे सीईओ जीन टूबॉल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, भारतात लोकांची खरेदीशक्ती वाढली आहे आणि त्यासोबत त्यांच्या पसंतीतही ‘प्रीमियम’ बदल झालाय. आता तरुण सामान्य दारू सोडून महागडे आणि प्रीमियम ब्रँड्सला प्राधान्य देतायत.

पर्नोड रिकार्डसारख्या दिग्गज कंपन्यांसाठी भारत आता फक्त एक बाजार नाही, तर ‘ग्रोथ इंजिन’ बनलाय. मागील आर्थिक वर्षात कंपनीच्या जागतिक विक्रीत भारताचा वाटा 13 टक्के होता. विशेष म्हणजे, या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलं आणि अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. जीन टूबॉल यांचं म्हणणं आहे की, दरवर्षी भारतात जवळपास 2 कोटी तरुण अशा वयात येतात जेव्हा ते कायदेशीररीत्या दारू पिऊ शकतात. हा प्रचंड ग्राहकवर्ग थेट बाजारात उतरतोय. भविष्यातील आर्थिक ट्रेंड्स सांगतायत की, दारूच्या खप आणि बाजाराच्या बाबतीत भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकेल. म्हणूनच कंपनी आता स्वस्त दारूच्या सेगमेंटमधून बाहेर पडून पूर्ण लक्ष प्रीमियम आणि सुपर-प्रीमियम ड्रिंक्सवर केंद्रित करतेय. कारण भारतीय आता ‘क्वालिटी’साठी पाकीट सैल करण्यास तयार आहेत.

जगापेक्षा वेगळा भारताचा ट्रेंड

जगभरात तरुण आरोग्याबाबत जागरूक होऊन दारूपासून दूर जातायत. पण भारतात मात्र उलट गंगा वाहतेय. २०२४ ते २०२९ या कालावधीत भारतात दारूचा खप ३५७ दशलक्ष लिटरने वाढेल असा अंदाज आहे. जग ‘सोबर’ (नशामुक्त) होत असताना भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारा अल्कोहोल बाजार बनण्याच्या मार्गावर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २०२० मध्ये भारतात प्रति व्यक्ति दारूचा खप ३.१ लिटर होता, २०२३ मध्ये तो ३.२ लिटर झाला आणि २०२८ पर्यंत ३.४ लिटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डनुसार, आज भारतातील दारूचा बाजार ६० अब्ज अमेरिकन डॉलरचा झाला आहे, जो जागतिक व्यापाराच्या नकाशावर भारताला अत्यंत महत्त्वाचा बनवतो. भारताचे तरुण प्रीमियम दारूला प्रचंड पसंती देतायत आणि हे क्रेझ दिवसेंदिवस वाढतंच चाललाय!

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम