AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकरी बापाच्या घामाचं चीज झालं; पोरगं अधिकारी झालं आणि…

आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्चया दिशेने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी सांगितले की या परीक्षेत सतत पेपर असतात आणि त्यानंतर मुलाखत होते. त्यामुळे या काळात खूप दडपण येते आणि अनेक वेळा तणावामुळे पेपर खराब जातो.

शेतकरी बापाच्या घामाचं चीज झालं;  पोरगं अधिकारी झालं आणि...
| Updated on: Apr 09, 2023 | 3:19 PM
Share

मुझफ्फरपूर : उत्तर प्रदेशमधील पीएससीचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर यश मिळवलेल्या उमेदवारांच्या घरातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या निकालात मुझफ्फरपूर जिल्ह्यातील राहुआ गावातील रहिवासी रामेश्वर शर्मा यांचा मोठा मुलगा आशुतोष कुमार याने उत्तर प्रदेशात सहावा क्रमांक मिळवून गावाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. आशुतोषचा निकाल आणि पोलीस उपअधीक्षक झाल्याची कळताच त्याच्या घरात आणि गावात आनंदाला पारावार उरला नाही. राहुलचे वडील रामेश्वर शर्मा शेती करतात.

मात्र आपल्या मुलाच्या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात की, आशुतोष सुरुवातीपासूनच हुशार होता. त्याच्या हुशारीमुळेच आणि त्याच्या कष्टामुळेच आमच्या परिश्रमाच आणि कुटुंबाचा नावलौकिक वाढला आहे.

शिक्षण गावातच झाले

आशुतोषचे प्रारंभीचे शिक्षण गावातीलच सरकारी शाळेत झाले. राहुआच्या विश्राम सिंह हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर एलएस कॉलेजमधून दहावीच्या पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर आशुतोष पुढील शिक्षणासाठी पश्चिम बंगालमधील वर्धमान विद्यापीठातून त्याने बी.टेक पदवी प्राप्त केली. आशुतोष सध्या बांगलादेशच्या सीमेवर सीमाशुल्क विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

परीक्षेतील यशामुळे गावात दिवाळी

आशुतोषच्या कुटुंबात वडील रामेश्वर शर्मा शेती करतात तर आई ममतादेवी गृहिणी आहे. आशुतोष आपल्या कुटुंबातील तीन भावांमध्ये सर्वात मोठा. आशुतोषने आपल्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील आणि कुटुंबातील सदस्यांना तसेच शिक्षकांना दिले आहे. या यशाने त्याचं सगळं गाव आनंदून गेलं. त्याच्या या यशानंतर सगळ्या गावात मिठाई वाटून सगळ्या गावाने आनंद व्यक्त केला. त्यामुले त्याच्या या यशाने गावाने दिवाळी साजरी केली.

ध्येय निश्चिती

या यशाबद्दल आशुतोष सांगतो की, तो कस्टम्समध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करत असताना या परीक्षेची तयारी करत होता. तरुणांना संदेश देताना ते म्हणतात की त्यांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्चया दिशेने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी सांगितले की या परीक्षेत सतत पेपर असतात आणि त्यानंतर मुलाखत होते. त्यामुळे या काळात खूप दडपण येते आणि अनेक वेळा तणावामुळे पेपर खराब जातो.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.