AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेट मॅन ऑफ इंडिया कोण आहे? काय करतो? व्हायरल व्हिडीओ

चालक, हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरण्यास टाळाटाळ करतात ही असतात. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने लोक अपघाताला बळी पडत आहेत.

हेल्मेट मॅन ऑफ इंडिया कोण आहे? काय करतो? व्हायरल व्हिडीओ
Helmet man of indiaImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 17, 2023 | 4:55 PM
Share

महामार्गावरील अपघातांच्या बातम्या दररोज चर्चेत असतात आणि त्यातील बहुतेक कारण चालक, हेल्मेट किंवा सीट बेल्ट वापरण्यास टाळाटाळ करतात ही असतात. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने लोक अपघाताला बळी पडत आहेत. अशा निष्काळजी वाहनचालकांना धडा शिकवण्याची आणि दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी बिहारमधील एका व्यक्तीने घेतली आहे. राघवेंद्र सिंह यांना सोशल मीडियावर ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखले जाते.

विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीला शिकवला धडा

राघवेंद्र सिंह अनेकदा वाहनचालकांना हेल्मेट आणि हेल्मेटशिवाय वाहन चालवण्याच्या धोक्यांविषयी इशारा देताना दिसतात. त्याने दुसऱ्या व्यक्तीला हेल्मेट दिल्याचा आणखी एक व्हिडिओ नुकताच ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या गाडीचा वेग 100 च्या वर नेत नाही पण लखनौ एक्सप्रेसवेवर जेव्हा एका व्यक्तीने मला ओव्हरटेक केले तेव्हा मी स्तब्ध झालो कारण हेल्मेट शिवाय त्याचा वेग आमच्यापेक्षा जास्त होता. त्याला प्रोटेक्टिव्ह हेल्मेट देण्यासाठी मला १०० च्या स्पीडपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवावी लागली आणि अखेर मी त्याला पकडले.”

आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवे वर शूट केलेला व्हिडीओ

राघवेंद्र यांनी आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर शूट केलेला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फुटेजमध्ये ते हेल्मेट घालून कार चालवताना दिसत आहे. ते विनाहेल्मेट असलेल्या त्या दुचाकीस्वाराला खिडकीतून नवीन हेल्मेट देतात आणि दुचाकी चालवताना हे हेल्मेट घाल असंही आवर्जून सांगतात. ही पोस्ट 11 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आणि त्याला अनेक प्रतिसाद मिळाले. मुंबई वाहतूक पोलिसांनीही या व्हायरल क्लिपवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “याला मनापासून लोकांची काळजी घेणे म्हटले जाते.”

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत