AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायीचं दूध वाढवण्यासाठी देशी जुगाड… थेट पायालाच बांधली बॉटल; पुढे काय घडलं?

शेतकऱ्यांचा नाद नाही करायचा. जे मोठ-मोठ्या डॉक्टरला जमणार नाही ते या शेतकऱ्यांने गाईसाठी केलं. अनेकांना माहिती नाही शेतकऱ्यांने गायीच्या पायाला बाटली का बांधली.

गायीचं दूध वाढवण्यासाठी देशी जुगाड... थेट पायालाच बांधली बॉटल; पुढे काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 06, 2026 | 3:51 PM
Share

Viral Video : शेतकऱ्यांची जिद्द, निरीक्षणशक्ती आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची बुद्धिमत्ता पुन्हा एकदा समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये त्याने महागड्या रबर मॅट्स परवडत नसल्याने साध्या प्लास्टिक बाटलीचा वापर करून गायीच्या आरोग्याचे संरक्षण केल्याचे दिसून आले आहे. यामुळेच ‘गरज हीच शोधाची जननी’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरत आहे.

दरम्यान, गायीच्या पायाला जखम झाल्यास ती नेहमी त्या जखमी बाजूनेच बसण्याचा प्रयत्न करते. यामुळे त्या जखमेवर सतत दबाव येतो आणि ती जखम अधिक गंभीर होण्याची तसेच संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी गायीला वेदना होतातच पण त्याचा थेट परिणाम तिच्या आरोग्यावर आणि विशेषतः दूध उत्पादन क्षमतेवर होतो. अनेक वेळा जखमा वाढल्यामुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट देखील होते.

ही समस्या टाळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने एक सोपी पण अत्यंत हुशार युक्ती शोधून काढली. त्याने गायीच्या जखमी पायाला एक प्लास्टिकची बाटली बांधली. गाय बसण्याचा प्रयत्न करताच ही बाटली आवाज करते. हा आवाज गायीला इशारा देतो. शिवाय बाटली असल्यामुळे त्या बाजूने बसणे गायीसाठी अस्वस्थ करणारे ठरते. त्यामुळे गाय आपोआप जखम नसलेल्या बाजूने बसते.

कमी खर्चात प्रभावी उपाय

या साध्या उपायामुळे जखमी पायावरचा ताण कमी होतो आणि जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. परिणामी गायीचे आरोग्य सुधारते, वेदना कमी होतात आणि दूध उत्पादनावर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो. अशा प्रकारे अत्यल्प खर्चात प्रभावी पशुसंवर्धनाचा उपाय या शेतकऱ्याने दाखवून दिला आहे.

प्लास्टिक बाटलीचा हा उपाय अत्यंत सोपा, स्वस्त आणि परिणामकारक असला तरी तो योग्य पद्धतीने आणि काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे. योग्य खबरदारी घेतल्यास हा उपाय पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक ठरू शकतो.

मात्र खबरदारी अत्यंत आवश्यक

तज्ज्ञांच्या मते, या व्हायरल व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने बाटली खूप घट्ट बांधलेली दिसते, जे योग्य नाही. अशा प्रकारे घट्ट बांधल्यास गायीच्या पायातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाटली बांधताना अतिशय सुरक्षित पद्धतीने बांधावी. नायलॉन दोरीऐवजी मऊ कापडी पट्टी वापरणे अधिक योग्य. प्लास्टिक बाटली वापरताना ती तीक्ष्ण कडा नसतील अशी कापून, कडांवर टेप गुंडाळावी. जखमी पाय असलेल्या जनावरांसाठी ओलसर जमीन घातक ठरते, त्यामुळे खाली कोरडे गवत, पोती किंवा गाद्या टाकल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.