AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

400 वर्षांपासून सुरक्षित आहे संताचं शरीर, सुई टोचल्यावर रक्त निघत असल्याचा महिलेचा दावा

सामान्य व्यक्तीसारखे नखं वाढतात. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे मृत शरीर कुणाचं आहे. हे मृत शरीर फ्रान्सिस जेवीअर यांचे आहे.

400 वर्षांपासून सुरक्षित आहे संताचं शरीर, सुई टोचल्यावर रक्त निघत असल्याचा महिलेचा दावा
| Updated on: Aug 13, 2023 | 4:13 PM
Share

मुंबई : जगात आजही अनेक न समजणारे रहस्य आहेत. हे रहस्य खोलण्याचे बरेच वेळा प्रयत्न झाले. पण, त्यात यश मिळालं नाही. असेच एक रहस्य भारतात आहे. गोवा राज्यात एक चर्च आहे. तिथं साडेचारशे वर्षांपूर्वीपासून तिथं एक मृत शरीर ठेवलेलं आहे. पण, विशेष म्हणजे ही शरीर सडलं किंवा कुजलेलं नाही. या मृत शरीराबद्दल असं सांगितलं जातं की, येथील मृत शरीरातून रक्त निघतं. सामान्य व्यक्तीसारखे नखं वाढतात. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे मृत शरीर कुणाचं आहे. हे मृत शरीर फ्रान्सिस जेवीअर यांचे आहे.

भारतात ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेबाबत जेवीअर यांना महत्त्व दिले जाते. त्यांचा जन्म ७ एप्रिल १५०६ मध्ये स्पेनमध्ये झाला. पोर्तुगीजांनी त्यांना संत बनवलं. तेव्हा पोर्तुगीजांचे राज्य गोव्यावर होते. जेवीअर यांना विशेष जबाबदारी देऊन ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी पाठवले होते.

का करण्यात आले नाही दफन?

जेवीअर यांनी आपलं धर्मप्रचाराचं काम व्यवस्थित केले. कित्तेक लोकं त्यांना संत म्हणून मानत होते. सेंट जेवीअर यांनी फक्त दहा वर्षांत मिशनरी ५२ वेगवेगळ्या राज्यात येशू ख्रिस्त यांचा प्रचार केला. त्यासाठी त्यांना नऊ हजार किलोमीटर फिरावे लागले. लोकांनी त्यांना गुरूस्थानी मानले. बरेच लोकं त्यांचे शिष्य झाले. हे जेवीअर यांनी भारतातच नव्हे तर चीन आणि जपानच्या आजूबाजूच्या देशातही काम केलं. चीनच्या समुद्री यात्रेदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.

शिष्याला सांगितले की,…

जेवीअर यांनी आपल्या शिष्याला सांगितले होती की मृत्यूनंतर त्यांचे शरीर गोव्यामध्ये ठेवावे. एका महिलेने असा दावा केला की, जेवीअर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात सुई टोचली असता रक्त लागलं. या चर्चमध्ये मृतदेह ठेवला त्याला आता साडेचारशे वर्षे झालीत. दर दहा वर्षांनी मृत शरीराची प्रदर्शनी ठेवण्यात येते. त्यावेळी वाढलेल्या नखांना कापले जाते. त्यावेळी ख्रिश्चन धर्माचे बरेच अनुयायी येथे येतात.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.