AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT Gold Medalist बनला संन्यासी! कारण वाचून धक्का बसेल…

आजकाल साधू असलेल्या एका माणसाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे साधू एकेकाळी आयआयटी दिल्लीचे टॉपर्स राहिलेले आहेत.

IIT Gold Medalist बनला संन्यासी! कारण वाचून धक्का बसेल...
IIT guy become saintImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 30, 2022 | 4:47 PM
Share

आता बहुतेक लोकांना लक्झरी लाइफ जगायला आवडतं. त्यासाठी ते भरपूर पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी नैतिक आणि अनैतिक यातील फरक विसरून जातात. आजकाल साधू असलेल्या एका माणसाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे साधू एकेकाळी आयआयटी दिल्लीचे टॉपर्स राहिलेले आहेत. आपण असं का केलं याचं कारण आता या व्यक्तीनं सांगितलंय.

ही व्यक्ती मॅनेजरपासून साधू बनलीय. मूळचे बिहारचे असलेले संदीपकुमार भट्ट यांनी 2002 मध्ये आयआयटी दिल्ली येथून बीटेक केले. ते त्यांच्या बॅचचे सुवर्णपदक विजेते होते.

2004 मध्ये त्यांनी एमटेकही केलं होतं. अभ्यासक्रम पूर्ण करताच त्यांनी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणूनही काम केले. पण मग असं काय झालं की त्याचं जगाबद्दलचं आकर्षण संपलं आणि त्याने संन्यासीचा मार्ग स्वीकारला. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितलंय.

मीडिया रिपोर्टनुसार, संदीप कुमार भट्ट यांनी वयाच्या 28 व्या वर्षी निवृत्ती घेतली. 2007 मध्ये ते साधू झाले. साधू झाल्यानंतर ते स्वामी सुंदर गोपालदास म्हणून ओळखले जाऊ लागले.

याबाबत बोलताना स्वामी सुंदर गोपालदास स्वत: सांगितात की, इंजिनीअर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते समाजात अनेक सापडतील. समाजाला वेगळा मार्ग दाखवणं किंवा लोकांचं चारित्र्य घडवणं असं ध्येय ठेवणारी माणसं सापडणार नाहीत.

समाजात पसरलेल्या चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी धार्मिक शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं मत ते व्यक्त करतात.

स्वामी सुंदर गोपालदास म्हणतात नोबेल पारितोषिक मिळणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारणं हे फार मोठं काम आहे.

यंत्राचा दर्जा वाढत चाललाय, पण माणसाचा दर्जा मात्र कमी होत चाललाय आहे असं मत स्वामी सुंदर गोपालदास यांचं आहे.

सुशिक्षित लोकांनी संत बनले पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. चांगला समाज वाढवायचा असेल तर असेल तर अशा लोकांनीही पुढे यायला हवे. यासाठीच मी संत मार्गाला लागलो असंही ते सांगतात.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा