
देशात नद्या, डोंगररांगा आणि पठारे असल्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेमार्ग उभारणे मोठे आव्हान ठरले. ज्यामध्ये डोंगराळ भागात रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी बोगदे तयार करावे लागले. अशाच ऐतिहासिक बोगद्यांपैकी एक म्हणजे ठाण्यातील पारसिक रेल्वे बोगदा.

पारसिक रेल्वे बोगदा हा भारतातील सुरुवातीच्या आणि सर्वात महत्त्वाच्या रेल्वे बोगद्यांपैकी एक मानला जातो. हा बोगदा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात असून तो ठाणे आणि दिवा यांच्या दरम्यान मुंबई–कल्याण मुख्य रेल्वे मार्गावर आहे.

हा बोगदा सुमारे 1.3 किलोमीटर लांबीचा असून तो दुहेरी ब्रॉड गेज आणि विद्युतीकृत आहे. हा बोगदा Parsik Hill कापून तयार करण्यात आला आहे, त्यामुळे त्याला ‘पारसिक सुरंग’ असे नाव देण्यात आले.

या बोगद्याचे बांधकाम 1906 साली सुरू झाले आणि जवळपास 1916 साली पूर्ण झाले. हा बोगदा कळवा आणि मुंब्रा या भागांना जोडतो. त्या काळात हा बोगदा आधुनिक अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण मानला जात होता. भारतीय रेल्वेच्या इतिहासातही त्याला विशेष महत्त्व आहे.

आजही मुंब्राकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या या बोगद्यातूनच जातात. ट्रेन बोगद्यात प्रवेश करताच अनेकांना अचानक अंधार, प्रतिध्वनी आणि जोराचा आवाज अनुभवायला मिळतो. त्यामुळे काही प्रवासी फोन कॉल बंद करतात तर काही मुले कान झाकून बसतात.

स्थानिक लोकांच्या मते, रात्रीच्या वेळी या परिसरात विचित्र सावल्या दिसणे किंवा ओरडण्यासारखे आवाज ऐकू येणे अशा घटना काहींनी सांगितल्या आहेत. त्यामुळे या बोगद्याबद्दल अनेक रहस्यमय कथा पसरल्या असून काहीजण त्याला भूतिया सुरंग असेही म्हणतात. तज्ज्ञांच्या मते मात्र हा बोगदा खूप जुना आणि लांब असल्यामुळे आत प्रतिध्वनी आणि हवेमुळे निर्माण होणारे आवाज ऐकू येतात. या नैसर्गिक आवाजांना अनेकदा लोक भूतांच्या गोष्टींशी जोडतात.