AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?

राज्यात मास्क घालणे (face mask) बंधनकारक करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी आर्थिक दंड ठोठावला जात आहे. पण तरीही अनेक लोक नाकाच्या खाली, हनुवटीवर मास्क ठेवतात.

मुंबई लोकलमध्ये पठ्ठ्या मास्क डोळ्यावर लावून झोपला, महाराष्ट्राचे मंत्री म्हणाले, कोरोनाची काय चूक?
मुंबई लोकलमध्ये मास्क डोळ्यावर ठेवून प्रवास करणारा प्रवासी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Feb 26, 2021 | 2:36 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या (Maharashtra corona update) पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. प्रशासनाकडून आवश्यकती खबरदारी घेतली जात आहे. अमरावती, जालना, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. शिवाय मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्येही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. मात्र लोक अजूनही मास्कबाबत गंभीर नसल्याचं चित्र आहे. राज्यात मास्क घालणे (face mask) बंधनकारक करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी आर्थिक दंड ठोठावला जात आहे. पण तरीही अनेक लोक नाकाच्या खाली, हनुवटीवर मास्क ठेवतात.

मुंबई लोकलमध्ये तर एका पठ्ठ्याने मास्क चक्क डोळ्यावर ठेवून झोपी गेला. हाच फोटो कुणीतरी प्रवाशाने काढला. तो फोटो आता व्हायरल होत आहे. हा फोटो युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ट्विट केला. काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची ? असं म्हणत सत्यजीत तांबेनी फोटो शेअर केला. मग तांबेंचं हे ट्विट मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रिट्विट केलं. “मित्रांनो असं बेजबाबदार वागू नका!, मास्कचा योग्य वापर करा , कमीत कमी स्वतः च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकरिता”, असं कॅप्शन वडेट्टीवारांनी लिहिलं.

लॉकडाऊन परवडणारे नाही – वडेट्टीवार

राज्यातील वाढत्या कोरोना आकडेवारीवर राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून महाराष्ट्र सरकार वाढती आकडेवारीची स्थिती गांभीर्यानं घेत असल्याचे म्हटले आहे. राज्याला आणि एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. मात्र लॉकडाऊन टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसेस मधील गर्दी कमी करणे आदी शक्यतांची पडताळणी केली जात असल्याचे ते म्हणाले. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

संबंधित बातम्या 

Special Report | ….म्हणून अर्धा महाराष्ट्र मास्क घालत नाही?

man keeps mask on eyes while traviling in Mumbai local

Follow Us
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!