AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway: असं होतं 1947 साली पाकिस्तानहून भारतात येणाऱ्या रेल्वेचं तिकीट, AC चं भाडं तर बघा

आपण पाकिस्तानातील रावळपिंडी ते भारतातील अमृतसर पर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत आहोत. पूर्वी रेल्वे तिकिटांचे छापील स्वरूप होते. या स्वरूपात कोणत्याही प्रवाशाला रेल्वेचे तिकीट देण्यात येत असे.

Indian Railway: असं होतं 1947 साली पाकिस्तानहून भारतात येणाऱ्या रेल्वेचं तिकीट, AC चं भाडं तर बघा
pakisatan railway ticketImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 05, 2023 | 5:12 PM
Share

रेल्वे हे केवळ भारतातच नव्हे तर शेजारच्या देशांमध्येही प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि उत्तम साधन मानले जाते. आज आम्ही तुम्हाला रेल्वेशी संबंधित एक गोष्ट दाखवणार आहोत, जी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही तुम्हाला 1947 चे रेल्वे तिकीट दाखवणार आहोत. हे तिकीट एसी कोचचे असून त्यात भाडेही देण्यात आले आहे.

आपण पाकिस्तानातील रावळपिंडी ते भारतातील अमृतसर पर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत आहोत. पूर्वी रेल्वे तिकिटांचे छापील स्वरूप होते. या स्वरूपात कोणत्याही प्रवाशाला रेल्वेचे तिकीट देण्यात येत असे. तिकिटावरील संपूर्ण माहिती पेनाने लिहिण्यात आली होती. हे तिकीट पाकिस्तानातून आलेल्या प्रवाशांनी विकत घेतले होते, त्यामुळे भारतातून जाणाऱ्या गाडीचेही तेच भाडे होते किंवा कमी-अधिक होते, असे म्हणता येणार नाही.

हे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या युजरने फेसबुकवर शेअर केले असून त्यात असेही लिहिले आहे की, हे तिकीट 17-09-1947 रोजी म्हणजेच स्वातंत्र्यानंतर 9 लोकांसाठी जारी करण्यात आले होते, जे रावळपिंडी ते अमृतसर होते. ज्याची किंमत 36 रुपये 9 आणे होती.

साहजिकच जेव्हा 9 लोकांसाठी 36 रुपये होते, तेव्हा एका व्यक्तीसाठी हे रेल्वे तिकीट 4 रुपये झाले असते. मात्र ज्यांनी 36 रुपयांचे हे तिकीट विकत घेतले आणि पाकिस्तानात सर्वकाही सोडून भारतात आले, त्यांच्यासाठी या तिकिटाची किंमत त्यांच्या वडिलोपार्जित काळापासून जमा झालेल्या संपूर्ण संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त असेल.

आज रेल्वेतील तिकिटांबद्दल बोलायचे झाले तर ते इतके सोपे झाले आहे की घरबसल्या तिकिटे बुक करता येतील. याशिवाय तिकीट मोबाइलवर येते.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.