AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसा बोंबलत! मंदिरात गेला अन् 4 कोटी रुपये दान करून आला; अखेर बाप का भडकला पोरींवर?

तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील एका 65 वर्षीय निवृत्त सैनिकाने आपल्या मुलींच्या वागण्याने त्रासून आपली 4 कोटींची संपत्ती एका मंदिराला दान केली आहे. मुलींच्या सततच्या टोमण्यांना कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला. संपत्ती परत मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे, तर सैनिक आपल्या निर्णयावर ठाम आहे. ही घटना तामिळनाडूत घडली आहे आणि तिने सर्वांनाच हादरवलं आहे.

बसा बोंबलत! मंदिरात गेला अन् 4 कोटी रुपये दान करून आला; अखेर बाप का भडकला पोरींवर?
Army SoldierImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 28, 2025 | 4:43 PM
Share

आईवडिलांची सेवा केली तर मेवा मिळतो असं म्हटलं जातं. प्राचीन काळापासून हेच प्रत्येक पिढीला सांगितलं जातं. पण प्रत्येक पिढीतील सर्वच मुलं ऐकतात कुठे? काही मुलं तर आपल्या आईवडिलांना म्हातारपणात नको नको करून सोडतात. परवाचीच गोष्ट, मुंबईत एका व्यक्तीने आज्जीला कॅन्सर झाला म्हणून तिला कचराकुंडीत टाकून दिलं. त्यामुळे सर्वच हादरून गेले होते. तामिळनाडूतही असंच काही घडलंय. मुलींच्या रोजच्या टोमण्यांना वैतागून एका व्यक्तीने थेट मंदिरालाच चार कोटी रुपये दान केले आहेत. त्यामुळे या मुलींवर मोठं आभाळच कोसलळं आहे.

तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील एका 65 वर्षीय निवृत्त सैनिकाने हा निर्णय घेतला. एस. विजयन असं या निवृत्त सैनिकाचं नाव आहे. त्याने मुलींवर नाराज होऊन आपली 4 कोटींची संपत्ती मंदिराला दान केली आहे. माझ्या दैनिक गरजांसाठीही मुलींनी मला सतत टोमणे मारले. माझ्याशी भांडणं केली. त्यामुळेच मी हा निर्णय घेतल्याचं विजयन यांचं म्हणणं आहे. तर ही संपत्ती परत मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी कायदेशीर लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: छोट्या पुढारीचं निधन? हार घातलेले फोटो व्हायरल, नेमकं काय आहे सत्य?

अन् मंदिर प्रशासनाला कळलं

एस. विजयन यांनी काही दिवसांपूर्वी अरुलमिगु रेणुगंबल अम्मन मंदिरात जाऊन आपल्या संपत्तीचे कागदपत्र दान केले. यात एक 3 कोटीची तर दुसरी 1 कोटीची संपत्ती आहे. मंदिरातील कागदपत्रांची छाननी केल्यावर मंदिर प्रशासनाला याची माहिती मिळाली.

दानपेटीत मिळाले कागदपत्र

दर दोन महिन्याला मंदिराची दानपेटी खोलल्या जाते. त्यात भक्तांनी देवाला चढवलेले पैसे, सोनं आणि इतर वस्तू असतात. या सर्वांना उघडून त्याची मोजदाद केली जाते. पण यावेळी नाणी आणि नोटांसोबत संपत्तीची कागदपत्रंही मिळाली. यात 10 सेंट जमीन आणि मंदिराच्या आसपासच्या एक मजली घरांचे कागदपत्रे होती. त्यासोबतच एक चिठ्ठीही लिहिलेली होती.

या ठिकाणी हे पहिल्यांदाच झालं आहे, असं मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम. सिलंबरासन यांनी सांगितलं. दानपत्रात कागदपत्रं टाकल्याने संपत्ती मंदिराची होत नाही. यासाठी दानकर्त्याला कायदेशीररित्या दान रजिस्टर करावं लागतं, असं सिलंबरासन यांनी स्पष्ट केलं.

विजयन तयार

दरम्यान, मी माझी संपत्ती मंदिराच्या नावे कायदेशीररित्या करण्यास तयार आहे. मी दान नोंदणी करायला तयार आहे. त्यासाठी मी मंदिराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करेन. मी माझा निर्णय मागे घेणार नाही. माझ्या मुलांनी माझ्या दैनिक गरजांसाठीही मला टोमणे मारले आहेत. आता हे सहन करण्याच्या पलिकडे गेलं आहे, असं विजयन म्हणाले.

विजयन हे रेणुगंबल अम्मन मंदिराचे भक्त आहेत. पत्नीपासून विभक्त झाल्यापासून ते एकटे राहत आहेत. त्यांच्या मुलींसोबतही त्यांचं पटत नाही. उलट त्यांच्या मुली त्यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. पण आता विजयन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कुटुंबाच्या तोंडचं पाणी पळालं आहे. ही संपत्ती परत मिळवण्यासाठी कुटुंबीयांनी आता कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण विजयन आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पेच वाढला आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.