AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3000 बॉम्ब पडल्यावर वीटही हालली नाही, भारताच्या सीमेवरील ‘ते’ रहस्यमयी मंदिर

भारतीय सिमेवर एक मंदिर असे आहे ज्यावर 1965 युद्धात बॉम्ब टाकण्यात आले. मात्र, एकही बॉम्ब मंदिराला हानी पोहोचवू शकला नाही.

3000 बॉम्ब पडल्यावर वीटही हालली नाही, भारताच्या सीमेवरील 'ते' रहस्यमयी मंदिर
TempleImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 07, 2025 | 1:14 PM
Share

राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेले तनोट माता मंदिर एक रहस्यमयी आणि चमत्कारिक स्थळ आहे. 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने या मंदिरावर हजारो बॉम्ब टाकले, परंतु एकही बॉम्बचा परिणाम मंदिरावर झाला नाही. विशेष म्हणजे, मंदिराच्या आवारात पडलेल्या काही बॉम्बचा स्फोटही झाला नाही. या चमत्कारामुळे तनोट माता मंदिराची ख्याती देशभरात पसरली. चला, या मंदिराच्या इतिहास आणि रहस्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

तनोट माता मंदिर: एक चमत्कारिक स्थळ

जैसलमेरमधील भारत-पाकिस्तान सीमेवर असलेले तनोट माता मंदिर हे श्रद्धेचे आणि चमत्कारांचे प्रतीक आहे. 1965 आणि 1971 च्या युद्धांदरम्यान पाकिस्तानी सैन्याने या मंदिरावर हल्ले केले, परंतु मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. असे जाते की, या मंदिरावर 3,000 बॉम्ब टाकण्यात आले. परंतु एकाही बॉम्बचा स्फोट मंदिराला हानी पोहोचवू शकला नाही. यापैकी 450 बॉम्बचा तर स्फोटच झाला नाही. हे बॉम्ब आजही तनोट माता मंदिरातील संग्रहालयात जतन केलेले आहेत. हे या मंदिराच्या चमत्काराची साक्ष देतात. वाचा: Video: महिलेच्या कानात शिरला साप, थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

1965 च्या युद्धातील चमत्कार

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याने तनोट माता मंदिरावर तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून हल्ला केला. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी 13 ग्रेनेडियरची एक कंपनी आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) दोन कंपन्या मेजर जय सिंह यांच्या नेतृत्वाखाली तैनात होत्या. त्यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडचा सामना केला. या युद्धात पाकिस्तानी सैन्याने मंदिरावर 3,000 बॉम्ब टाकले. परंतु मंदिराला कोणतीही हानी पोहोचली नाही. हा चमत्कार पाहून सैनिक आणि स्थानिकांमध्ये मंदिराविषयी श्रद्धा अधिक दृढ झाली.

पाकिस्तानी सैन्याचा पराभव

1965 च्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने या परिसरावर कब्जा करण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. त्यांचे सैन्य भारतीय सीमेत चार किलोमीटरपर्यंत घुसले होते. मात्र, भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान पोहोचवले. ज्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. या युद्धानंतर तनोट माता मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाने (BSF) स्वीकारली. आजही BSF चे जवान मंदिराची देखभाल, स्वच्छता आणि रोजच्या आरतीचे आयोजन करतात.

तनोट माता मंदिराची ख्याती

1965 आणि 1971 च्या युद्धांनंतर तनोट माता मंदिराची ख्याती देशभरात पसरली. स्थानिकांसह देशभरातील भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. मंदिराच्या चमत्कारिक कथा आणि युद्धकाळातील घटनांनी या स्थळाला एक विशेष स्थान मिळवून दिले आहे. मंदिरातील संग्रहालयात ठेवलेले न स्फोटित बॉम्ब हे मंदिराच्या दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात.

Follow Us
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....