
सर्वसामान्य लोकांच्या गरज लक्षात घेऊन भारत सरकार लोकांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवत असते. लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना आणते. जेणेकरून या योजनांचा लाभ सगळ्या गरजवंतांना निशुल्क आणि कमी दारात घेता येईल. भारतातील अनेक लोक आजही असेच आहेत. ज्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे कमावता येत नाहीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार अशा लोकांना कमी खर्चात रेशन पुरवते.
कमी खर्चात लोकांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून लोकांना शिधापत्रिका देण्यात येते. शिधापत्रिकेवर लोकांना कमी खर्चात धान्याच्या सर्व सुविधेचा लाभ मिळतो. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही. त्या लोकांना कमी खर्चात उपलब्ध असलेल्या धान्यांच्या सुविधेचा लाभ मिळत नाही. त्यातच जर शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव जोडले नसेल तर तुम्ही अगदी सहज या पद्धतीने घरातील सदस्याचे नाव जोडू शकता. चला तर जाणून घेण्यात शिधापत्रिकेत नाव जोडण्याची सोपी प्रक्रिया काय असेल.
जर तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजूनही जोडले गेले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या सदस्याचे नाव ऑनलाइन पद्धतीने शिधापत्रिकेमध्ये जोडू शकाल. यासाठी तुमच्याकडे कुटुंबप्रमुखाचे शिधापत्रिका आणि त्याची फोटो कॉपी असणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेमध्ये मुलांचे नाव जोडायचे असल्यास मुलाचा जन्म दाखला त्यासोबत पालकांचे आधार कार्डही आवश्यक आहे. तसेच शिधापत्रिकेमध्ये जर विवाहित महिलेचे नाव जोडायचे असल्यास त्या महिलेचे आधार कार्ड, लग्नाचा दाखला आणि आई- वडिलांचे रेशनकार्ड आवश्यक आहे.