AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतामधील कोणतं राज्य सर्वात स्वस्त मजूर पुरवतं? कुठे आहे सर्वाधिक बेरोजगारी? उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही

भारतामध्ये सर्वात स्वस्त मजूर कोणतं राज्य पुरवतं? कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारी आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पण उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही, परंतु ही खरी परिस्थिती आहे.

भारतामधील कोणतं राज्य सर्वात स्वस्त मजूर पुरवतं? कुठे आहे सर्वाधिक बेरोजगारी? उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही
LabourImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 10:06 PM
Share

काल एक मे होता, एक मे हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर एक मे हा कामगार दिन देखील आहे. वर्षभर राब राब राबणाऱ्या श्रमिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते. मात्र यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये वाढत असलेली बेरोजगारी आणि कामगारांचे सुरू असलेले हाल यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचं नाव बदलून आता श्रमिक प्रदेश करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा देशभरातील स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या मजुरांचा तसेच बेरोजगार तरुणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सगळ्या स्वस्त मजूर कोणत्या राज्यात?

एका रिपोर्टनुसार देशात सर्वात स्वस्त मजुरांबाबत बोलायचं झाल्यास मध्य प्रदेश, गुजरात, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्ये भारातामधील सर्वात स्वस्त मजूर मिळतात. या राज्यांमध्ये ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच कमी मजुरी मिळते. या राज्यातील मजूर प्रचंड मेहनत करतात, परंतु त्यांना अपेक्षित मोबदला भेटत नाही. देशात सर्वात स्वस्त मजूर कुठे भेटत असतील तर ते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी मजुरीच्या यादीमध्ये मध्य प्रदेशचा देशात पहिला क्रमांक लागतो. इथे मजुरांना दिवस भर काम केल्यावर अवघे 246.3 रुपये एवढाच मोबदला मिळतो.

याशिवाय गुजरात आणि त्रिपुरामध्ये देखील मजुरांना अत्यल्प मजुरी मिळते. पूर्वोत्तर राज्यांची देखील तीच स्थिती आहे. नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये देखील मजुरांचे हाल सुरू आहेत, या राज्यात देखील मजुरांना खूपच कमी मोबदला मिळतो. तर देशात सर्वाधिक बेरोजगारी लक्षद्वीपमध्ये आहे, तर त्याच्यापाठोपाठ केरळचा नंबर लागतो. केरळमध्ये देखील बेरोजगारीचा दर प्रचंड मोठा आहे. केरळमधील अनेक लोक रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात किंवा देशात स्थलांतर करतात.

Follow Us
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....