AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतामधील कोणतं राज्य सर्वात स्वस्त मजूर पुरवतं? कुठे आहे सर्वाधिक बेरोजगारी? उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही

भारतामध्ये सर्वात स्वस्त मजूर कोणतं राज्य पुरवतं? कोणत्या राज्यात सर्वाधिक बेरोजगारी आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पण उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही, परंतु ही खरी परिस्थिती आहे.

भारतामधील कोणतं राज्य सर्वात स्वस्त मजूर पुरवतं? कुठे आहे सर्वाधिक बेरोजगारी? उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही
LabourImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 02, 2026 | 10:06 PM
Share

काल एक मे होता, एक मे हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर एक मे हा कामगार दिन देखील आहे. वर्षभर राब राब राबणाऱ्या श्रमिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते. मात्र यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये वाढत असलेली बेरोजगारी आणि कामगारांचे सुरू असलेले हाल यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचं नाव बदलून आता श्रमिक प्रदेश करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा देशभरातील स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या मजुरांचा तसेच बेरोजगार तरुणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सगळ्या स्वस्त मजूर कोणत्या राज्यात?

एका रिपोर्टनुसार देशात सर्वात स्वस्त मजुरांबाबत बोलायचं झाल्यास मध्य प्रदेश, गुजरात, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्ये भारातामधील सर्वात स्वस्त मजूर मिळतात. या राज्यांमध्ये ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच कमी मजुरी मिळते. या राज्यातील मजूर प्रचंड मेहनत करतात, परंतु त्यांना अपेक्षित मोबदला भेटत नाही. देशात सर्वात स्वस्त मजूर कुठे भेटत असतील तर ते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी मजुरीच्या यादीमध्ये मध्य प्रदेशचा देशात पहिला क्रमांक लागतो. इथे मजुरांना दिवस भर काम केल्यावर अवघे 246.3 रुपये एवढाच मोबदला मिळतो.

याशिवाय गुजरात आणि त्रिपुरामध्ये देखील मजुरांना अत्यल्प मजुरी मिळते. पूर्वोत्तर राज्यांची देखील तीच स्थिती आहे. नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये देखील मजुरांचे हाल सुरू आहेत, या राज्यात देखील मजुरांना खूपच कमी मोबदला मिळतो. तर देशात सर्वाधिक बेरोजगारी लक्षद्वीपमध्ये आहे, तर त्याच्यापाठोपाठ केरळचा नंबर लागतो. केरळमध्ये देखील बेरोजगारीचा दर प्रचंड मोठा आहे. केरळमधील अनेक लोक रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात किंवा देशात स्थलांतर करतात.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी