AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Scheme : विवाहित महिलांना केंद्र सरकारचे आर्थिक पाठबळ, 6000 रुपयांचे अर्थसहाय्य, तुम्हाला मदत मिळाली का?

Government Scheme : विवाहित महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने योजना सुरु केली आहे..

Government Scheme : विवाहित महिलांना केंद्र सरकारचे आर्थिक पाठबळ, 6000 रुपयांचे अर्थसहाय्य, तुम्हाला मदत मिळाली का?
विवाहितांना अर्थसहाय्यImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 24, 2022 | 6:54 PM
Share

नवी दिल्ली : विवाहित महिलांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने (Central Government) महिलांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना (Financial Aid) सुरु केली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात (Bank Account) 6000 रुपये जमा होणार आहे. परंतु, हा लाभ केवळ विवाहित महिलांना होणार आहे. हा लाभ कसा मिळेल, ते पाहुयात..

मातृत्व वंदना योजनेतंर्गत (PM Matritva Vandana Yojana) विवाहितेला ही मदत मिळणार आहे. योजनेनुसार, गर्भवती महिलेला केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक सहाय्य देण्यात येते. त्यामुळे मातृत्व काळात महिलेला मदत मिळते.

जन्माला येणारे मुलं कुपोषित नसावे, ते निरोगी असावे यासाठी ही योजना मदत करते. त्यासाठी ही योजना अर्थसहाय्य करते. त्यामाध्यमातून महिलेला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे महिलेला औषधांचा खर्च करता येतो.

या योजनेत पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना देण्यात येतात. तर शेवटच्या टप्प्यात बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयात 1000 रुपयांची मदत देण्यात येते.

केंद्र सरकारकडून देण्यात येणारी ही मदत, गर्भवती महिलेच्या बँक खात्यात सरळ हस्तांतरीत करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करताना काही समस्या आल्यास हेल्पलाइन क्रमांक 7998799804 यावर संपर्क करता येईल.

योजनेसंबंधीची माहिती https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत लिंकवर मिळेल. त्यावर तुम्हाला सर्व तपशील मिळेल.  अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे जमा करावी यासंबंधीची सर्व माहिती या संकेतस्थळावर मिळेल.

या योजनेची वैशिष्ट्ये काय

गर्भवती महिलेचे वय 19 वर्षे असावे

या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल

6000 रुपये केंद्र सरकार तीन हप्त्यात बँक खात्यात हस्तांतरीत करते

या योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.