AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही दुधाची पिशवी अशा प्रकारे कापता का? काठाचा तुकडा वेगळा करणे असते अत्यंत धोकादायक ! जाणून घ्या, कसे ?

आता एक मोठा वर्ग दुधाच्या पॅकेटचाच वापर करीत आहे. अनेकांच्या घरी दुधाची प्लास्टिकची पाकिटे येतात, म्हणजे पॅकेट दूध. तुमच्या घरातही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दूध येत असेल, पण अनेकजण या पॅकेटमधून योग्य पद्धतीने दूध काढत नाहीत, असे मानले जाते.

तुम्हीही दुधाची पिशवी अशा प्रकारे कापता का? काठाचा तुकडा वेगळा करणे असते अत्यंत धोकादायक ! जाणून घ्या, कसे ?
| Updated on: May 23, 2022 | 11:22 PM
Share

मुंबईः आपल्या प्रत्येकाच्याच घरी दुधाचे पॅकेट (Packet of milk) येते. परंतु, बहुतेकदा, लोक प्लास्टिकच्या पॅकेटमधून दूध काढण्यासाठी कोपरा कापतात आणि एक तुकडा वेगळे करतात. पण, ही एक वाईट सवय मानली जाते. होय, अशा प्रकारे दुधाची पाकिटे कापणे पर्यावरणास हानिकारक (Harmful to the environment)आहे. असं कसं होऊ शकतं याचाही विचार तुम्ही करत असाल. तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की हा कट केलेला भाग पॅकेटमधून वेगळा न करण्याचा सल्ला का दिला जातो. यानंतर तुम्हाला समजेल की दुधाच्या पॅकेटमधून तुकडा वेगळे करणे किती धोकादायक आहे आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो. दुध पॅकेटपासून छोटा तुकडा वेगळा कापून फेकला तर, अशा परिस्थितीत हे छोटे तुकडे पुनर्वापर (Recycle small pieces) करता येत नाहीत, त्यामुळे ते केवळ कचरा वाढवण्याचे काम करतात. पर्यावरणाच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक मानले जाते.

दुध पॅकेट कापण्याचा योग्य मार्ग कोणता आहे?

सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगतो की दुधाचे पॅकेट कापण्याची योग्य पद्धत कोणती आहे. खरं तर, पर्यावरणावर काम करणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हाही प्लास्टिकच्या पॅकेटमधून दूध काढले जाते तेव्हा त्या पिशवीचा कोणताही भाग वेगळा करू नका. जर तुम्ही कोपऱ्यातून पॅकेट कापत असाल तर कोपऱ्याचा भाग संपूर्ण पॅकेटपासून वेगळा होणार नाही यासाठी प्रयत्न करा. तुम्ही पॅकेटला जोडलेल्या कोपऱ्याचा काही भाग सोडा. याशिवाय, तुम्ही फक्त छिद्र करून त्यातून दूध काढू शकता, ज्यामुळे कोपरे वेगळे होण्याची समस्या दूर होईल.

कोपऱ्याचा तुकडा का काढू नये?

आता प्रश्न असा आहे की पाउचचा कोपरा तुकडा वेगळा का करू नये. दररोज असे लाखो कोपरे कापल्यानंतर डस्टबिनमध्ये जात असल्याचे चित्र आहे. लाखो तुकड्यांचा हा कचरा मोठ्या कचऱ्याच्या प्लास्टिकच्या स्वरूपात जमा होतो. तसेच प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात वाढत आहे, अशा प्रकारे कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. परंतु, या कचऱ्याचा पुनर्वापर करता येत नसल्याने हा कचरा आणखी चिंतेचा विषय मानला जात आहे. त्यावर छापलेल्या अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की संपूर्ण पॅकेट पुनर्वापराच्या प्रक्रियेतून जाऊ शकते, परंतु लहान तुकड्यांसह ते शक्य नाही.

मायक्रोप्लास्टिकमध्ये होते रूपांतर

तुमच्या घरातील दोन पाकिटांबद्दल बोलायचं झालं तर हा कचरा फारसा दिसत नाही, पण रोज लाखो तुकडे अशा कचऱ्याचा भाग बनतात आणि त्याचा पुनर्वापर न करता येणाऱ्या कचऱ्यात समावेश होतो. म्हणून, हा तुकडा कधीही वेगळा करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा पर्यावरणासाठी ते कठीण होईल.

आम्ही तुम्हाला सांगतो की दुधाचे पॅकेट लो-डेन्सिटी पॉलीथिलीन (LDPE) चे बनलेले असते, जे एक प्रकारचे प्लास्टिक आहे. पुनर्वापर करण्यासाठी, या प्रकारच्या प्लास्टिकला उच्च तापमानात आणि विशिष्ट आकारात संकुचित करावे लागते. परंतु, कोपरे कापून निर्माण होणारा कचरा रिसायकलिंग युनिटपर्यंत पोहोचत नाही आणि त्याचे मायक्रोप्लास्टिकमध्ये रूपांतर होते. हा कचरा समुद्र इत्यादींसाठी देखील धोकादायक असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे दुध पॅकेटचा कोपरा कापणे पूर्णपणे टाळा.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.