AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money : इसको फॉलो किया तो लाईफ झिंगालाला..पैसा इतक्या वर्षातच डबल झाला..

Money : पैसा डबल झालेला कोणाला नकोय? तोही कोणत्याही फसवणुकीच्या स्कीमशिवाय..मग काय आहे ते पैसा डबल करण्याचे गोल्डन रुल्स..

Money : इसको फॉलो किया तो लाईफ झिंगालाला..पैसा इतक्या वर्षातच डबल झाला..
हे गोल्डन रुल माहिती आहेत का?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 24, 2022 | 1:16 PM
Share

नवी दिल्ली : पैसा डबल (Rupee Double) झालेला कोणाला नकोय? तोही कोणत्याही फसवणुकीच्या स्कीमशिवाय (Fraud Scheme). पण आपल्या कुणाकडेच जादूई छडी नाहीये की अलादीनचा कंदिल आहे. पण पैसा डबल करण्याचे गोल्डन रुल्स (Golden Rules) आहेत..पण ते समजून घेणे आवश्यक आहे.

72 चा नियम काय आहे? तुमची गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी Rule of 72 म्हणजे 72 चा नियम उपयोगी पडू शकतो. वैयक्तिक अर्थनियोजनातील हा सर्वात लोकप्रिय नियम आहे. या नियमानुसार, तुम्हाला गुंतवणुकीत सातत्य ठेवल्यास किती वर्षात गुंतवणूक दुप्पट होईल हे कळेल.

एव्हरेज कंपाऊंडिंग रेट ऑफ इंटरेस्टच्या आधारे तुम्हाला किती वर्षात रक्कम दुप्पट होते याची माहिती मिळते. जर तुम्हाला गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के परतावा मिळत असेल तर या नियमानुसार, 72 / 10 = 7.2 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होईल.

तुम्ही स्टॉक, बाँड्स, एफडी, बचत खाते या विविध प्रकारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याठिकाणी कमी-अधिक नुकसान झाले तरी त्याची सरासरी जर चांगली येत असेल तर तुम्हाला साधारणतः 15 ते 20 वर्षांत रक्कम दुप्पट मिळेल.

शेअर्समध्ये वार्षिक 10% सरासरी परतावा मिळेल. बाँड्स आणि अन्य डेट गुंतवणुकीत तुम्हाला वार्षिक 5% सरासरी तर बचत खात्यात वार्षिक 3% सरासरी परतावा मिळेल. या सर्वांचा एकत्रित विचार केला ,कमी जोखीम गृहित धरता दहा ते पंधरा वर्षे तरी दामदुप्पट होण्यास लागतील.

शेअर्समध्ये 10 टक्के परतावा गृहित धरल्यास 72 / 10 = 7.2 वर्षात रक्कम दामदुप्पट होईल. तर बाँड्समध्ये याच फॉर्म्युलाने 72 / 5 = 14.4 वर्षे लागतील. पण बचत खात्यातील गुंतवणुकीवर सर्वात कमी व्याजदर मिळते. त्यामुळे ही गुंतवणूक दामदुप्पट योजनेसाठी सर्वाधिक कालावधी घेते. या सूत्रानुसार, 72 / 3 = 24 वर्षांत तुमची रक्कम दुप्पट होईल.

गुंतवणूक करताना जोखिमेचा विचारही करावा लागतो. तसेच जबाबदारी आणि वयाचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकाच ठराविक उत्पन्नावर वय आणि जबाबदारी वाढल्यानंतर ताण येतो आणि गुंतवणूक मर्यादीत होते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.