AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Bond ETF : चांगला परतावा मिळण्यासाठी भारत बाँड ईटीएफ उत्तम पर्याय, जाणून घ्या कशी करायची गुंतवणूक

भारत बाँड ईटीएफमध्ये ट्रिपल ए (एएए) रेटिंगसह सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. 2030 आणि 2031 मध्ये मॅच्युअर झालेल्या भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्सनंतर 6 टक्के रिटर्न मिळू शकेल. (India Bond ETF is the best option to get good returns, Learn how to invest)

Bharat Bond ETF : चांगला परतावा मिळण्यासाठी भारत बाँड ईटीएफ उत्तम पर्याय, जाणून घ्या कशी करायची गुंतवणूक
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 28, 2021 | 10:37 PM
Share

नवी दिल्ली : आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर मार्केट गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र गुंतवणुकीसह चांगले रिटर्नही पाहिजे असतील तर भारत बाँड ईटीएफ हा एक उत्तम पर्याय आहे. भारत बॉन्ड ईटीएफची खरेदी-विक्री एक्सचेंजवर होते. तो आपला निधी सरकारी कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवतो. ही गुंतवणूक फक्त तिहेरी ए रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या रोख्यांमध्ये होते. बाँडचा मॅच्युरिटी कालावधी फंडाच्या मॅच्युरिटीच्या जवळपास असतो. भारत बाँड ईटीएफमध्ये ट्रिपल ए (एएए) रेटिंगसह सरकारी कंपन्यांचा समावेश आहे. 2030 आणि 2031 मध्ये मॅच्युअर झालेल्या भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास टॅक्सनंतर 6 टक्के रिटर्न मिळू शकेल. (India Bond ETF is the best option to get good returns, know how to invest)

कोण करू शकते गुंतवणूक?

भारतातील रहिवासी, एक अनिवासी भारतीय(Non-resident Indian) किंवा कंपनी, फर्म किंवा हिंदू अविभाजित कुटुंब भारत बॉन्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकते. यासाठी त्याच्याकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

गुंतवणूकीचे पर्याय

दोन मॅच्युरिटी कालावधी दरम्यान गुंतवणूकदार कोणताही पर्याय निवडू शकतात. 1. 3 ते 5 वर्षांच्या मुदतीसह अल्प मुदत. 2. 10 वर्षापर्यंत मॅच्युरिटीसह दीर्घकालीन मुदत.

पैसे काढण्याची प्रक्रिया

भारत बॉन्ड ईटीएफची मॅच्युरिटी कालावधी वेगवेगळी असते. परंतु यामध्ये लॉक-इन पीरियड नाही. यामागचे कारण हे आहे की त्याचा शेअर बाजारात व्यापार होतो. जर गुंतवणूकदारास कोणत्याही कारणास्तव पैसे काढण्याची गरज भासली असेल तर तो एक्सचेंजवर आपली युनिट्स विकू शकतो. त्या दिवशी युनिटच्या किंमतीनुसार, त्याला पैसे मिळतील.

या गोष्टी लक्षात ठेवा

भारत बॉन्ड ईटीएफमध्ये थेट गुंतवणूक करण्याचा पर्यायही गुंतवणूकदारास आहे. तो फंड हाऊसच्या भारत बाँड फंड ऑफ फंड योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. भारत बॉन्ड ईटीएफने सरकारी कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक केली असली तरी ते कोणत्याही आश्वासन परताव्याची हमी देत ​​नाही. (India Bond ETF is the best option to get good returns, know how to invest)

इतर बातम्या

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन द्या; सदाभाऊ खोत बैल आणि नांगर घेऊन बँकेसमोर

ईडीला सर्व पुरावे मिळाले, अनिल देशमुखांना अटक होईल : अ‍ॅड. जयश्री पाटील

Follow Us
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप