AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?

Ration : आता राशन बाबत सरकारने नवा नियम काढला आहे..पण हा नियम करण्याची गरज का पडली..

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?
दोनदा दाबा आंगठाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही ही राशन कार्डधारक (Ration card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारी स्वस्त धान्य योजनेसंदर्भात (Rationing Scheme) सरकारने मोठा बदल केला आहे. आता लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनदा आंगठा द्यावा लागणार आहे. आता हा बदल कोणत्या राज्य सरकारने (state Government) केला आणि का केला ते पाहुयात..

रेशनबाबतीत हा बदल केला आहे, मध्य प्रदेश सरकारने. राज्य सरकारने याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, आता राशनिंगसाठी दोनवेळा आंगठा दाबावा लागणार आहे. त्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.

जर लाभार्थ्यांनी या नियमांचे पालन केले नाही. त्यांनी नियमाची अंमलबजावणी केली नाही. अथवा या प्रक्रियेत अडथळा आणला तर त्यांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना धान्य हवे असेल तर त्यांना राज्य सरकारचा नियम पाळावा लागेल.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावतीने दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना प्रत्येकी 5-5किलो धान्य वितरीत करण्यात येते. त्यामुळे त्यांना आता केंद्रासाठी एकदा आणि राज्य सरकारसाठी दुसऱ्यांदा धान्य घेतले म्हणून दोनदा आंगठा दाबावा लागेल.

सध्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर एकदा आंगठा दिल्यावर लाभार्थ्यांना राशन देण्यात येते. परंतू, या ऑक्टोबर महिन्यात ही व्यवस्था बदलण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारसाठी एक-एक असे दोनदा आंगठा दाबावा लागेल.

या प्रक्रियेमुळ राशन मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. जेवढे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी करतील. तेवढा या प्रक्रियेला उशीर लागणार आहे. कारण त्याशिवाय लाभार्थ्याच्या खात्यावर धान्य वितरीत केले जाणार नाही.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत देशभरात केंद्र सरकार जवळपास 80 कोटी जनतेला प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो गहू आणि तांदळाचे वितरण करते. त्यासाठी प्रति किलो दोन ते तीन रुपये आकारण्यात येतात.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक