AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?

Ration : आता राशन बाबत सरकारने नवा नियम काढला आहे..पण हा नियम करण्याची गरज का पडली..

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?
दोनदा दाबा आंगठाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही ही राशन कार्डधारक (Ration card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारी स्वस्त धान्य योजनेसंदर्भात (Rationing Scheme) सरकारने मोठा बदल केला आहे. आता लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनदा आंगठा द्यावा लागणार आहे. आता हा बदल कोणत्या राज्य सरकारने (state Government) केला आणि का केला ते पाहुयात..

रेशनबाबतीत हा बदल केला आहे, मध्य प्रदेश सरकारने. राज्य सरकारने याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, आता राशनिंगसाठी दोनवेळा आंगठा दाबावा लागणार आहे. त्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.

जर लाभार्थ्यांनी या नियमांचे पालन केले नाही. त्यांनी नियमाची अंमलबजावणी केली नाही. अथवा या प्रक्रियेत अडथळा आणला तर त्यांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना धान्य हवे असेल तर त्यांना राज्य सरकारचा नियम पाळावा लागेल.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावतीने दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना प्रत्येकी 5-5किलो धान्य वितरीत करण्यात येते. त्यामुळे त्यांना आता केंद्रासाठी एकदा आणि राज्य सरकारसाठी दुसऱ्यांदा धान्य घेतले म्हणून दोनदा आंगठा दाबावा लागेल.

सध्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर एकदा आंगठा दिल्यावर लाभार्थ्यांना राशन देण्यात येते. परंतू, या ऑक्टोबर महिन्यात ही व्यवस्था बदलण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारसाठी एक-एक असे दोनदा आंगठा दाबावा लागेल.

या प्रक्रियेमुळ राशन मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. जेवढे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी करतील. तेवढा या प्रक्रियेला उशीर लागणार आहे. कारण त्याशिवाय लाभार्थ्याच्या खात्यावर धान्य वितरीत केले जाणार नाही.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत देशभरात केंद्र सरकार जवळपास 80 कोटी जनतेला प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो गहू आणि तांदळाचे वितरण करते. त्यासाठी प्रति किलो दोन ते तीन रुपये आकारण्यात येतात.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत