AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?

Ration : आता राशन बाबत सरकारने नवा नियम काढला आहे..पण हा नियम करण्याची गरज का पडली..

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?
दोनदा दाबा आंगठाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही ही राशन कार्डधारक (Ration card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारी स्वस्त धान्य योजनेसंदर्भात (Rationing Scheme) सरकारने मोठा बदल केला आहे. आता लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनदा आंगठा द्यावा लागणार आहे. आता हा बदल कोणत्या राज्य सरकारने (state Government) केला आणि का केला ते पाहुयात..

रेशनबाबतीत हा बदल केला आहे, मध्य प्रदेश सरकारने. राज्य सरकारने याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, आता राशनिंगसाठी दोनवेळा आंगठा दाबावा लागणार आहे. त्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.

जर लाभार्थ्यांनी या नियमांचे पालन केले नाही. त्यांनी नियमाची अंमलबजावणी केली नाही. अथवा या प्रक्रियेत अडथळा आणला तर त्यांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना धान्य हवे असेल तर त्यांना राज्य सरकारचा नियम पाळावा लागेल.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावतीने दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना प्रत्येकी 5-5किलो धान्य वितरीत करण्यात येते. त्यामुळे त्यांना आता केंद्रासाठी एकदा आणि राज्य सरकारसाठी दुसऱ्यांदा धान्य घेतले म्हणून दोनदा आंगठा दाबावा लागेल.

सध्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर एकदा आंगठा दिल्यावर लाभार्थ्यांना राशन देण्यात येते. परंतू, या ऑक्टोबर महिन्यात ही व्यवस्था बदलण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारसाठी एक-एक असे दोनदा आंगठा दाबावा लागेल.

या प्रक्रियेमुळ राशन मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. जेवढे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी करतील. तेवढा या प्रक्रियेला उशीर लागणार आहे. कारण त्याशिवाय लाभार्थ्याच्या खात्यावर धान्य वितरीत केले जाणार नाही.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत देशभरात केंद्र सरकार जवळपास 80 कोटी जनतेला प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो गहू आणि तांदळाचे वितरण करते. त्यासाठी प्रति किलो दोन ते तीन रुपये आकारण्यात येतात.

मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.