AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?

Ration : आता राशन बाबत सरकारने नवा नियम काढला आहे..पण हा नियम करण्याची गरज का पडली..

Ration : आता राशनसाठी एकदा नाही तर दोनदा दाबा आंगठा, नाहीतर राशन विसरा.. पण का?
दोनदा दाबा आंगठाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 21, 2022 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली : जर तुम्ही ही राशन कार्डधारक (Ration card Holder) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारी स्वस्त धान्य योजनेसंदर्भात (Rationing Scheme) सरकारने मोठा बदल केला आहे. आता लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनदा आंगठा द्यावा लागणार आहे. आता हा बदल कोणत्या राज्य सरकारने (state Government) केला आणि का केला ते पाहुयात..

रेशनबाबतीत हा बदल केला आहे, मध्य प्रदेश सरकारने. राज्य सरकारने याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, आता राशनिंगसाठी दोनवेळा आंगठा दाबावा लागणार आहे. त्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.

जर लाभार्थ्यांनी या नियमांचे पालन केले नाही. त्यांनी नियमाची अंमलबजावणी केली नाही. अथवा या प्रक्रियेत अडथळा आणला तर त्यांना धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थ्यांना धान्य हवे असेल तर त्यांना राज्य सरकारचा नियम पाळावा लागेल.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावतीने दारिद्रय रेषेखालील व्यक्तींना प्रत्येकी 5-5किलो धान्य वितरीत करण्यात येते. त्यामुळे त्यांना आता केंद्रासाठी एकदा आणि राज्य सरकारसाठी दुसऱ्यांदा धान्य घेतले म्हणून दोनदा आंगठा दाबावा लागेल.

सध्या सार्वजनिक वितरण प्रणालीवर एकदा आंगठा दिल्यावर लाभार्थ्यांना राशन देण्यात येते. परंतू, या ऑक्टोबर महिन्यात ही व्यवस्था बदलण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकारसाठी एक-एक असे दोनदा आंगठा दाबावा लागेल.

या प्रक्रियेमुळ राशन मिळण्यास आता आणखी उशीर होणार आहे. जेवढे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी करतील. तेवढा या प्रक्रियेला उशीर लागणार आहे. कारण त्याशिवाय लाभार्थ्याच्या खात्यावर धान्य वितरीत केले जाणार नाही.

राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत देशभरात केंद्र सरकार जवळपास 80 कोटी जनतेला प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो गहू आणि तांदळाचे वितरण करते. त्यासाठी प्रति किलो दोन ते तीन रुपये आकारण्यात येतात.

Follow Us
न्यायव्यवस्थेला वाळवी लागले, न्यायालयांवर दबाव आहे; राऊतांचा हल्लाबोल
न्यायव्यवस्थेला वाळवी लागले, न्यायालयांवर दबाव आहे; राऊतांचा हल्लाबोल.
शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच... अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...
शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच... अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे....
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक.
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा.
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग....
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग.....
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM..
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM...
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......