AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan : लाखो कर्जदारांनी निवडला सायलंट किलर! आता निवृत्तीनंतर ही फेडा कर्जाचे हफ्ते

Home Loan : कोरोना काळात अनेकांनी स्वस्तात कर्ज मिळत असल्याने घर खरेदी केले. पण दोन वर्षानंतर आता ईएमआयच्या हप्त्यात झालेली वाढ डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हे कर्ज ग्राहकांसाठी सायलन्ट किलर ठरले आहे.

Home Loan : लाखो कर्जदारांनी निवडला सायलंट किलर! आता निवृत्तीनंतर ही फेडा कर्जाचे हफ्ते
| Updated on: Mar 28, 2023 | 7:23 PM
Share

नवी दिल्ली : नोकरदार वर्ग असो वा इतर सर्वसामान्य नागरीक असो, घराचे स्वप्न बँकेच्या गृहकर्जानेच (Home Loan) पूर्ण होते. पण गेल्या वर्षभरात व्याज दरांनी (Interest Rate) जी रॉकेट भरारी घेतली आहे. त्यावरुन हे स्वप्न आता सर्वसामान्यांसाठी प्रचंड महागडे ठरल्याचे दिसून येत आहे. ईएमआयमध्ये (EMI) कमाल वाढ झाली आहे. अनेकांच्या महिन्याचे आर्थिक बजेट त्यामुळे कोलमडले आहे. कर्जाचा हप्ता फेडता फेडता त्यांचे नाकी नऊ आले आहेत. काहींना कर्जाचा कालावधी वाढवून घेतला आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता तर कमी झालाच आहे, पण कालावधी वाढला आहे. परिणामी हे गृहकर्ज देशातील कोट्यवधी कर्जदारांसाठी सायलेंट किलर ठरत आहे.

इतका वाढला ईएमआय

मध्यमवर्ग कर्ज घेऊन घराचं स्वप्न साकारतो. 20 ते 30 वर्षांसाठी हे कर्ज घेण्यात येते. नोकरीच्या कालावधीत हे कर्ज सहज फेडता येईल, असा त्यामागील व्होरा असतो. पण वाढलेल्या ईएमआयमुळे आता या स्वप्नाला सुरुंग लागला आहे. गेल्या वर्षभरापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) व्याजदरात जी वाढ केली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. गृहकर्जावरील व्याजदर 6.5 टक्क्यांहून वाढून 9.5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. बँका व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. त्यामुळे ईएमआय वाढत असेल तर त्याची तरतूद करण्यासाठी काही तरी उपाय शोधणे आवश्यक आहे.

कालावधीत वाढ

मध्यमवर्गाने मोठ्या आशेने स्वस्तात कर्ज मिळवले होते. पण महागाई आणि आरबीआयच्या धोरणामुळे त्यावर पाणी फेरले. महागाईवर उतारा म्हणून सातत्याने रेपो दरात वाढ होत आहे. परिणामी बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. गेल्यावर्षी कर्ज 6.5 ते 7% या व्याजदराने मिळत होते. आता हेच व्याजदर 9.5 टक्के ते 10 टक्क्यांदरम्यान पोहचले आहे. काही बँकांनी ग्राहकांचा ईएमआय वाढवला नाही तर कर्जाचा कालावधी वाढवला आहे. त्यांनी दोन वर्षे कर्जाचा कालावधी वाढवला आहे. म्हणजे ज्यांनी 20 ते 30 वर्षांसाठी हे कर्ज घेतले. ते आता 22 किंवा 32 वर्षांपर्यंत वाढले आहे. म्हणजे ज्यांनी उशीरा कर्ज घेतले, ते निवृत्त झाल्यानंतर ही कर्जाचा हप्ता फेडत राहतील.

फ्लोटिंग रेट्सची डोकेदुखी

एक वर्षापूर्वी घर खरेदी करणे सोपे होते. त्यावेळी व्याजदर 6. 5% होते, पण गेल्या 10 महिन्यात गृहकर्जाच्या व्याजदरात दरवाढ झाली. आता हे व्याजदर 9% आणि त्यापेक्षा अधिक झाले आहे. फ्लोटिंग रेटनुसार गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांची डोकेदुखी अधिक वाढली आहे. व्याज दर जसे वाढत आहेत, तसा त्यांचा ईएमआय वाढत आहे. वाढत्या व्याजदरामुळे नवीन घर खरेदीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसल्याने घर खरेदी मंदावली आहे.

तातडीने उपाय शोधा

  1. गृहकर्जाचे ओझे कमी करण्यासाठी तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे
  2. ज्या बँकेत व्याजदर कमी असेल, त्याठिकाणी तमचे गृहकर्ज हस्तांतरीत करा
  3. गृहकर्जाची मूळ रक्कम जमा केल्यास कर्जाचा हप्ता अजून कमी होईल
  4. बँकेतील अधिकाऱ्यांशी थेट बोला, त्यामुले व्याजदर कमी होण्याचा उपाय निघू शकतो.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.