एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या उर्वरित अनेक जबाबदाऱ्या इतर कुटुंबातील सदस्यांना पार पाडाव्या लागतात. यात बँक, विमा, पीपीएफ खाते यासंह इतर कामांचा समावेश आहे.

एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bank
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 7:35 AM

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचा अचानक मृत्यू झाला. कोरोनाच्या या युद्धात अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य गमावले. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या उर्वरित अनेक जबाबदाऱ्या इतर कुटुंबातील सदस्यांना पार पाडाव्या लागतात. यात बँक, विमा, पीपीएफ खाते यासंह इतर कामांचा समावेश आहे. पण एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते, तेव्हा त्यासाठी नेमकं काय करावं लागते, ते खाते बंद करायचे की ते तसेच सुरु ठेवता येते? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

मृत्यूनंतर अकाऊंटचे काय होते?

जर मृताच्या कुटुंबातील सदस्यांना त्या खात्याबद्दल माहिती नसेल आणि पुढे 2 वर्षे त्या खात्यातून कोणताही व्यवहार होत नसेल तर ते इनअॅक्टिव्ह केले जाते. त्यानंतर बँकेकडून त्या ग्राहकाला किंवा नॉमिनीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. ते खाते पुन्हा सुरु करण्यास सांगितले जाते. मात्र जर त्यानंतर पुढील 10 वर्षांपर्यंत इनऑपरेटिव्ह अकाऊंटमधून कोणताही व्यवहार झाला नाही तर त्यात जमा केलेली रक्कम आणि त्याचा व्याज हा शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये (Education and Awareness Fund) ट्रान्सफर केला जातो. दरम्यान याची माहिती ग्राहकांच्या घरी दिली जाते.

अकाऊंटचे काय करावे?

एखाद्या कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्याचे अकाऊंट बंद करण्याची घाई करु नका. Money 9 या वेबसाईटवरील एका वृत्तानुसार LLP चे गुंतवणूक सल्लागार हर्ष रुंगटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही मृत व्यक्तीचे बँक खाते बंद करण्याची घाई करू नका. कारण त्यात कौटुंबिक पेन्शन, लाभांश, व्याज यासारखे काही उत्पन्न असतात, जे कुटुंबासाठी उपयुक्त ठरतात. तुम्ही कोणत्याही मृत व्यक्तीचे अकाऊंट सहजरित्या बंद करु शकता.

अकाऊंट बंद करण्यासाठी अर्ज कधी कराल? 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कुटुंबातील सदस्यांसाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. आपण कधीही बँकेत खाते बंद करण्यासाठी अर्ज करु शकता. जेव्हा त्या मृत्यू झालेल्या परिवारातील कुटुंब मानसिकदृष्ट्या तयार असेल तेव्हा हे कार्य केले जाऊ शकते. RBI च्या सूचनेनुसार, या अकाऊंटमधील पैसे काढण्यासंबंधिचा अर्ज हा 15 दिवसात करणे गरजेचे आहे.

अकाऊंट बंद करण्याची प्रक्रिया

जर तुम्हाला एखादे बँक खाते बंद करायचे असेल तर त्याला नोटरी असलेले मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यानंतर या अकाऊंटच्या नॉमिनीला हे सर्व पैसे मिळतीत. पण जर त्यासाठी कोणताही नॉमिनी व्यक्ती नसेल तर त्या कुटुंबातील वारसा हक्कानुसारच्या सदस्याला ते पैसे दिले जातील. मात्र यावेळी त्याला मृत्यूच्या दाखल्यासह त्याच्यात आणि मृत व्यक्तीच्या बँकेत नातेसंबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील.

(What Happens To Bank Accounts After Death check details here)

संबंधित बातम्या : 

रेकॉर्ड ब्रेक: देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे

Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत घसरण; उच्च स्तरापासून अजूनही 7,945 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा

‘या’ बँकेची मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा 6 तास राहणार बंद; बँकेने सांगितलं ‘कारण’

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.