Special Report | चेंबूरमध्ये दरड कोसळल्यानं दु: खाचा डोंगर, मुसळधार पावसात मृत्यू तांडव!
मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहे.
मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींच्या नावाची यादी समोर आली आहे. यातील जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Latest Videos
Latest News