शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ‘हे’ सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलय; संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे
मुंबई : अयोध्येत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मंडळ गेले आहे. त्याचदरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळीने सुरूवात करत शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. राऊत यांनी, गेल्या 72 तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्य हैराण झालं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील शेतकरी संकटात सापडा आहे. मात्र या सरकार अधिवेशनातल्या घोषणांचा विसर पडला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

