शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ‘हे’ सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेलय; संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे
मुंबई : अयोध्येत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री मंडळ गेले आहे. त्याचदरम्यान राज्यात पुन्हा एकदा अवकाळीने सुरूवात करत शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. राऊत यांनी, गेल्या 72 तासात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्य हैराण झालं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील शेतकरी संकटात सापडा आहे. मात्र या सरकार अधिवेशनातल्या घोषणांचा विसर पडला. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला गेल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट

