सोयाबीन पिकामध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कापूस पिके पाण्याखाली बुडाली असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक धक्का बसला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सध्या पाण्याखाली बुडालेल्या सोयाबीन आणि कापूस पिकांमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे आठ दिवसांपूर्वी शेतात पाणी साचले आहे आणि गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. शेतीचा पूर्णतः नास झाल्याने शेतकऱ्यांना ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारने आठ दिवसांत पंचनामे करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही पंचनामे झाले नाहीत. शेतकरी सरकारकडून तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास स्वामी आणि संभाजी मुंडे यांनी अंबाजोगाई बीड येथून ही माहिती पाठविली आहे.
Published on: Sep 11, 2025 11:19 AM
Latest Videos
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..

