AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?

CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 24, 2026 | 10:31 AM
Share

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून गेल्या तीन दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांकडून गेल्या तीन दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण घटनेची माहिती घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी आंदोलकांच्या भावना आणि मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणात रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला. तसेच हत्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी नातेवाईक आणि आंदोलकांना दिले. या आश्वासनानंतर रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आले.

त्यानंतर विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या प्रकरणातील चौकशी आणि आरोपींवर होणाऱ्या कारवाईकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याचे नाव समोर आणत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. त्यानुसार पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवून घेतला असून, त्यातील माहितीची पडताळणी आणि चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Jun 24, 2026 10:31 AM

Follow Us