Bihar Election Results : 10 हजारांच्या योजनेमुळं महिलांनी पटलवला गेम? बिहारवर शरद पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. महिलांना मिळालेल्या दहा हजार रुपयांच्या योजनेमुळे हा निकाल लागल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. शरद पवारांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर संजय राऊतांनी भाजप आणि आयोगाच्या संगनमताचा आरोप केला. मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने प्रचंड विजय मिळवला आहे. या विजयामागे महिला फॅक्टर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना, निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा करण्यात आल्याने हा निकाल लागल्याचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने अशा गैरमार्गाचा विचार करावा, असे म्हटले आहे. पवारांनी सरकारी तिजोरीतून निवडणूक प्रचारासाठी पैसे वापरले जात असल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला.
या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक होता (महिला ७१.०६%, पुरुष ६६.९१%). याच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’अंतर्गत १ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये टाकण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधत भाजप आणि आयोगाच्या संगनमताचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जनता दल युनायटेडने (जेडीयू) दावा केला आहे.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा

