साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने कसं निवडून दिलं?, Raosaheb Danve यांनी सांगितला निवडणुकीचा किस्सा

एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला. त्यावर, लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल. शेवटचं मत देऊन टाकावं. म्हणून निवडून आले असतील, असं खोतकरांनी सांगितलं.

| Updated on: Sep 25, 2021 | 6:49 PM

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे जिथे जातात तिथे जुन्या आठवणींना उजाळा देत एक एक रंजक किस्से सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी लोटते. पुण्यातही त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. त्यांना लोकांनी साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने कसं निवडून दिलं याचं गुपितच सांगितलं. रावसाहेब दानवे आज पुण्यात होते. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी निवडणुकीतील विजयाचा किस्साच सांगितला. निवडणुकीत दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्यावर मी विजयाचा प्रमाणपत्रं घ्यायला गेलो होतो. त्यावेळी अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर सोबत होते. मला एवढं मोठं मताधिक्य पडल्याने लोणीकरांना मोठा प्रश्न पडला. एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला. त्यावर, लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल. शेवटचं मत देऊन टाकावं. म्हणून निवडून आले असतील, असं खोतकरांनी सांगितलं. दानवे यांनी हा किस्सा ऐकवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तो इतका की दानवेंनाही हसू अवरेना झालं.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.