AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prasad Lad | संजय राऊत आणि मलिकांनी रोज लवंगी लावतात आम्ही बॉम्ब फोडणार - प्रसाद लाड

Prasad Lad | संजय राऊत आणि मलिकांनी रोज लवंगी लावतात आम्ही बॉम्ब फोडणार – प्रसाद लाड

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 6:17 PM
Share

मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. दिवाळीच्या तोंडावर रायकीय फटाके फुटत आहेत. अशावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ते रोज लवंग्या फोडत आहेत, दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय.

मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. दिवाळीच्या तोंडावर रायकीय फटाके फुटत आहेत. अशावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ते रोज लवंग्या फोडत आहेत, दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय.

दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील. निश्चितपणे मला याबाबत माहिती नाही. पण शनिवारी 26/11 आणि 93 ब्लास्टचे फटाके फुटणार, असा दावा लाड यांनी केलाय. जर टीव्हीवर फुटेज मिळालं असेल तर राज्य सरकारनं कारवाई करावी. मला, दरेकर, गिरीश महाजन, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या सगळ्यांना राज्य सरकार त्रास देत आहे. ते आम्हाला सोडत नाहीत, चौकशी सुरु आहे. राज्य सरकार यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा गंभीर आरोप लाड यांनी केलाय. फटाक्यांचा दारुगोळा फटाके फुटल्यानंतर समजतो. देवेंद्र फडणवीस मोठा फटाका फोडणार तेव्हा कळेल की घात घोतो की अपघात, असा सूचक इशाराही लाड यांनी दिलाय.

संजय राऊत चौथ्यांदा खासदार झालेत. त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत, असा टोला लाड यांनी लगावलाय. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पात 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्याबाबतचं एक पत्र त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पाठवलं होतं. त्यावेळी राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या कंपनीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.