राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा; म्हणाले, LIC, SBI आणि EPFO पैसा…
गांधी म्हणाले की, एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओचे भांडवल अदानींना दिले जात आहे, पण ना तपास होत आहे, ना जबाबदारी आहे
नवी दिल्ली : मी सावरकर नाही, गांधी आहे. माफी मागणार नाही, असे म्हणत भाजपचा राग राहुल गांधींनी ओढावून घेतला. त्यावरून सध्या त्याच्यावर टीका होत आहे. तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मी प्रश्न विचारतोय म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवत एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओ भांडवलावरून प्रश्न विचारला आहे.
गांधी म्हणाले की, एलआयसी, एसबीआय आणि ईपीएफओचे भांडवल अदानींना दिले जात आहे, पण ना तपास होत आहे, ना जबाबदारी आहे. शेवटी पंतप्रधान मोदी इतके घाबरले का? असे म्हटले होते. राहुल गांधींनी ट्विट करून विचारले की, जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे?
Published on: Mar 27, 2023 03:37 PM
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
