काँग्रेसचं जहाज भरकलेलं; विखे पाटीलांची राहुल गांधीवर ही टीका
राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.
बुलढाणा : राज्यासह देशात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्यावरून सध्या जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपनेही यावरून सभागृहात तसेच रस्त्यावर उतरत हल्लाबोल केला. त्यावरून राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या विरोधात निकाल गेला तर सत्तेचा दुरुपयोग आणि आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायव्यवस्थेवर विश्वास अशी भूमिका काँग्रेसची आहे. ही राजकारणातली दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेसचे जहाज भरकटलेले आहे, अशी टीका राहुल गांधी यांच्या प्रकरणावरून केली आहे. तर राहुल गांधी हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत भाष्य करतात असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

