…म्हणून उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली; वज्रमूठ सभेवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
Chandrakant Patil : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
पुणे : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा झाली. त्यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. आमची भिती वाटते म्हणून उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. “महत्वाचं म्हणजे एका गिरणी कामगाराचा मुलाचा उल्लेख होतो हे अतिशय चांगलं आहे. झोपेच्या सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवता येत नाही. उद्धवजी, एकदा व्हीडिओ लावुया आणि त्यात काय चुकलं काय बरोबर आहे बघुया…आघाडीला अस्तिवाची लढाई सुरू आहे म्हणूनच कसबामध्ये एकही बंडखोर उभा राहिला नाही. वज्रमूठ ही भितीमधून तयार झाली आहे”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
Published on: Apr 03, 2023 12:56 PM
Follow Us
Latest Videos
युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, सामान्या
संजय राऊतांनी इराणचं केलं तोंडभर कौतुक; म्हणाले 'या देशाकडून...
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...

